संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळे 43 दिवसांपासून गेला कुठं?

Krishna Andhale: संतोष देशमुखांच्या हत्येतला आरोपी कृष्णा आंधळे गेला कुठं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Jan 22, 2025, 09:50 PM IST
संतोष देशमुखांचा मारेकरी कृष्णा आंधळे 43 दिवसांपासून गेला कुठं?
कृष्णा आंधळे

Krishna Andhale: सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळेला  बीड पोलिसांकडून वॉन्टेड म्हणून घोषित करण्यात आलंय..त्याच्यावर माहिती देणाऱ्यास बक्षीस जाहीर केलंय..पोलिसांवर दुसऱ्यांदा आंधळेवर बक्षीस जाहीर करण्याची नामुष्की ओढवलीये.. पोलिसांना आंधळे का सापडत नाही असा प्रश्न बीड जिल्ह्यातल्या जनतेकडून विचारला जातोय.

Add Zee News as a Preferred Source

संतोष देशमुखांच्या हत्येतला आरोपी कृष्णा आंधळे गेला कुठं असा प्रश्न सगळ्यांनाच पडलाय. देशातील सर्वोत्तम पोलीस दलांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र पोलिसांना कृष्णा आंधळे अजूनही सापडलेला नाही. कृष्णा आंधळेच्या मागावर फक्त परळी पोलीसच नाहीत तर सीआयडी आणि एसआयटीही कृष्णा आंधळेचा शोध घेतायेत. कृष्णा आंधळे हा सुदर्शन घुलेसोबत फरार होता. पुण्यात जेव्हा सुदर्शन घुले सापडला तेव्हा पोलिसांना कृष्णा आंधळेनं गुंगारा दिला. कृष्णा आंधळे सापडला नसल्यानं पोलिसांनी त्याची माहिती देणाऱ्यावर बक्षीस जाहीर केलं होतं. तरीही कृष्णाची माहिती मिळाली नाही. त्यामुळं पोलिसांनी दुसऱ्यांदा त्याच्यावर बक्षीस जाहीर केलंय.

कृष्णा आंधळे यानं पकडलं जाण्याच्या भीतीनं सर्वांशीच संपर्क तोडल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कृष्णा आंधळे हा चहा बिस्कीटं खाऊन दिवस काढू शकतो. शिवाय फरार असताना त्यानं एका मंदिराचा आश्रय घेतल्याचीही माहिती आहे. त्यामुळं आताही तो असाच कुठंतरी लपला असावा असा पोलिसांना संशय आहे.

सैफ अली खानचा हल्लेखोर अवघ्या काही तासांत पकडला जातोय. पण वाल्मिक कराडचा साथीदार 43 दिवसांपासून कसा सापडत नाही असा सवाल विचारला जातोय.

संतोष देशमुखांचा एक मारेकरी 43 दिवसानंतरही सापडत नाही. पोलीस फक्त बक्षीस जाहीर करुन स्वतःची जबाबदारी झटकू पाहयातत का असा प्रश्न आता परळीकर विचारु लागलेत.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More