Davos Investment Maharashtra: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसमध्ये विक्रमी करार केलेत. दोन दिवसांत तब्बल 15 लाख 70 हजार कोटींच्या गुंतवणुकीचे करार करण्यात आलेत. जवळपास 54 सामंजस्य करारांवर मुख्यमंत्र्यांनी स्वाक्षरी केलीय. या गुंतवणुकीमधून राज्यात तब्बल 15 लाखांवर रोजगार उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं मिशन दावोस फते होताना पाहायला मिळतंय. दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडल्याचं पाहायला मिळतंय.. दावोसमध्ये उद्योजकांनी महाराष्ट्रालाच पसंती दिल्याचं पाहायला मिळालं.दावोस दौऱ्यात विक्रमी गुंतवणूक आणि करार करण्यात आलेत. दावोसमध्ये 2 दिवसांमध्ये तब्बल 15 लाख 70 हजार कोटींची गुंतवणुकीचे करार करण्यात आलेत.. त्यामुळे राज्यात जोरदार गुंतवणूक येणाराय.. या माध्यमातून राज्यात जवळपास 15 लाखांवर रोजगार निर्मिती होणाराय.. मुख्यमंत्र्यांनी तब्बल 54 सामंजस्य करार केलेत.. यापैकी रिलायन्स आणि अमेझॉनसोबत सर्वात मोठे करार झाल्याचं पाहायला मिळालं..
रिलायन्स - 3 लाख 5 हजार कोटी
अॅमेझॉन - 71 हजार 795 कोटी
हिरानंदानी समूह-51 हजार 600 कोटी
ब्लॅकस्टोन- 43 हजार कोटी
टिमॅसेक कॅपिटल मॅनेजमेंट- 43 हजार कोटी
वर्धान लिथियम - 42 हजार 535 कोटी
टाटा समूह- 30 हजार कोटी
व्हीआयटी सेमिकॉन्स- 24 हजार 437 कोटी
इंडोरामा- 21 हजार कोटी
ईरुलर्निंग सोल्युशन्स- 20 हजार कोटी
दावोसमध्ये झालेल्या 54 करारांपैकी या मोठ्या 10 गुंतवणुकदार कंपन्या आहेत.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऐतिहासिक कामगिरी करत विक्रमी गुंतवणुकीचे करार केलेत. या उद्योगांमधून रोजगार निर्मितीही महत्वाची आहे. त्यामुळे या करारांची लवकरात लवकर अंमलबजावणी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जातेय.
महाराष्ट्र सरकारने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने 3 लाख 5 हजार कोटी रुपयांचा ऐतिहासिक सामंजस्य करार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून याबद्दल माहिती दिली.अनंत अंबानी यांच्या नेतृत्वाखाली नवीन ऊर्जा, किरकोळ विक्री, आतिथ्य आणि उच्च तंत्रज्ञान उत्पादन यासह विविध क्षेत्रांमध्ये 3 लाखांहून अधिक रोजगार संधी निर्माण झाल्याचे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. यावेळी अनंत अंबानी यांनी विकसित भारताच्या उभारणीतील परिवर्तनकारी प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आर.आय.एल. नवीन भारताच्या उभारणीत योगदान देण्यास वचनबद्ध असल्याचे अनंत अंबानी यावेळी म्हणाले. महाराष्ट्राला भारताच्या 5 ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे नेण्याच्या प्रयत्नाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. भारत लवकरच पहिली ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या या ऐतिहासिक गुंतवणुकीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनंत अंबानी यांचे आभार मानले.
"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."
...Read More|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.