)
Gopichand Padalkar over Controvesial Statement: भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यासंदर्भात अत्यंत आक्षेपार्ह विधान केलं असून, यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. शरद पवारांनी याची दखल घेत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करुन नाराजी व्यक्त केली आहे. स्वत: देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली. यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर टीका करत नरेंद्र मोदींच्या मातोश्री बाबतीत एआयच्या माध्यमातून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध केला तेव्हा शरद पवारांनी फोन केला होता का? अशी विचारणा केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांना फोन केला. फोनवर पडळकरांना सल्ला दिला. यापुढे अशा टीका न करण्याच्या मुख्यमंत्र्यांकडून गोपीचंद पडळकरांना सूचना करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या सूचनांचा यापुढे पालन करणार आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केलं आहे.
देवेंद्र फडणीस यांच्या मातोश्रीवर शरद पवारांनी खालच्या पातळीवर टीका केली होती, तेव्हा त्यांनी फोन केला होता का? पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मातोश्री बाबतीत एआयच्या माध्यमातून आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसिद्ध केला, त्यावेळी शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना फोन करून निषेध व्यक्त केला होता का? असे असेल तर सांगा मी बोलेन, असं सांगत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर केलेल्या वादग्रस्त विधान प्रकरणी ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीकडून गोपीचंद पडळकर यांच्या विधानाच्या विरोधात जिल्हाभर आंदोलन करण्यात येत आहे.
सांगलीच्या जत पंचायत समितीचे कनिष्ठ अभियंता अवधूत वडार आत्महत्या प्रकरणावरून करण्यात आलेल्या आरोपांच्या निषेधार्थ गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली जत मध्ये जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. त्यावेळी जयंत पाटलांवर टीका करताना गोपीचंद पडळकर यांची जीभ घसरली आहे. "जयंत पाटील हे राजारामबापू पाटील यांची औवलाद वाटत नाही, काही तरी गडबड आहे का?" अशा अर्वाच्या भाषेत आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे. गोपीचंद पडळकरांच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
'अरे जयंत पाटला तुझ्यासारखी भिकारी औलाद गोपीचंद पडळकरची नाही. माझ्यात धमक आहे ती कार्यक्रम करायची. तुझ्यासारख्याची औलाद नाही. तू राजाराम पाटलाने काढलेली औलाद मला अजिबात वाटत नाही,' असं वादग्रस्त विधान पडखळकरांनी आपल्या भाषणादरम्यान केलं.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांनी, "गोपीचंद पडळकरांनी जे स्टेटमेंट केलं ते योग्य आहे असं माझं मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल स्टेटमेंट करणं हे योग्य नाही. यासंदर्भात गोपीचंद पडखळकरांशीही मी बोललेलो आहे. त्यांनाही मी सांगितलं आहे. मला शरद पवारांचा फोन आला होता. ते ही माझ्याशी बोलले. मी त्यांनाही सांगितलं की अशाप्रकारच्या स्टेटमेंट आम्ही कधीच समर्थन करणार नाही," असं स्पष्ट केलं.
"गोपीचंद पडळकर हे तरुण नेते आहेत. अतिशय आक्रमक नेते आहेत. अनेकदा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल हे ते लक्षात घेत नाहीत. म्हणून मी त्यांना सांगितलंय की हे लक्षात घेऊनच आपण आक्रमकपणा ठेवला पाहिले. तुम्हाला भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. तुम्ही बोलताना आपल्या बोलण्याचा काय अर्थ निघेल याचा विचार केला पाहिजे, याचा विचार करावा असा सल्ला दिला आहे," अशी माहिती फडणवीसांनी दिली.
FAQ
1) गोपीचंद पडळकर कोण आहेत?
गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्रातील भाजपाचे आमदार (पेन मतदारसंघ) आणि मावळा समाजाचे नेते आहेत. ते त्यांच्या आक्रमक आणि वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जातात. पूर्वी युवा स्वाभिमान संघटना चालवत, आता भाजपात आहेत. त्यांच्या अशा विधानांमुळे अनेकदा राजकीय वाद निर्माण होतात, जसे की शरद पवारांवरील टीका किंवा धार्मिक मुद्द्यांवर बोलणे.
2) जयंत पाटील कोण आहेत?
जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) माजी प्रदेशाध्यक्ष आणि सांगली जिल्ह्यातील नेते आहेत. ते माजी मंत्री असून, राजारामबापू पाटील यांचे पुत्र आहेत. ते शेतकरी आणि ग्रामीण मुद्द्यांवर सक्रिय आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.
3) पडळकरांनी जयंत पाटीलांबाबत नेमके काय वादग्रस्त विधान केले?
१८ सप्टेंबर २०२५ रोजी सांगलीतील एका कार्यक्रमात बोलताना पडळकर म्हणाले, "हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद असल्यासारखे मला अजिबात वाटत नाही. काहीतरी गडबड आहे. ही राजारामबापू पाटील यांची औलाद असेल असं वाटत नाही." हे विधान जयंत पाटीलांच्या वडिलांचा अपमान करणारे आणि त्यांच्या वंशाबद्दल संशय व्यक्त करणारे होते. पडळकर हे पाटीलांच्या एका प्रकरणात 'गोवण्याच्या' प्रयत्नावरून बोलत होते.
4) हे विधान कशामुळे झाले?
पडळकर आणि जयंत पाटील यांच्यात सांगली जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून राजकीय तणाव आहे. गेल्या आठवड्यातील एका प्रकरणात पाटील यांनी पडळकरांवर खंडणीचा आरोप केला होता, ज्याला पडळकरांनी प्रत्युत्तर दिले. हे विधान त्या वादाचा भाग आहे, ज्यात पडळकरांनी पाटीलांना "बिनडोक माणूस" आणि "महाराष्ट्र कसा चालवला" असेही म्हटले.