प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातला लॉकडाऊन आज मध्यरात्रीपासून शिथील होणार आहे. लॉकडाऊन शिथील झाल्यानंतरची नवी नियमावलीही जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केली आहे. नव्या नियमांनुसार दुकानं सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत सुरु ठेवता येणार आहेत. तसंच शहरी आणि ग्रामीण भागातील उद्योगधंदे आणि एमआयडीसी ५० टक्के कर्मचाऱ्यांमध्येच सुरू ठेवता येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सकाळी ६ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत रिक्षा वाहतुकीलाही परवानगी देण्यात आली आहे, पण शॉपिंग मॉल, मार्केट तसंच केस कर्तनालय मात्र बंदच राहणार आहेत. खाजगी तसंच धार्मिक कार्यक्रमांवरही बंदी कायम आहे. संध्याकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी कायम असणार आहे. 


कोल्हापुरात ६० वर्षांवरील दुकानांचे माल, कर्मचारी तसंच ग्राहक यांना घराबाहेर पडता येणार नाही. जिल्हाधिकाऱ्यांचा हा नवा आदेश ३१ जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहणार आहे.