महायुतीचा मास्टरप्लान! कशी होणार महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक?

Maharashtra Legislative Council: विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी 27 मार्चला निवडणूक प्रक्रीया पार पडणार आहे. 

प्रविण दाभोळकर | Updated: Mar 17, 2025, 08:57 PM IST
महायुतीचा मास्टरप्लान! कशी होणार महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक?
विधान परिषद निवडणूक

Maharashtra Legislative Council: विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 27 मार्च रोजी होणारी निवडणुक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जातेय. विधान परिषदेवरील आमदार विधान सभेला निवडून आल्यानंतर रिक्त झालेल्या पाच जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. महायुतीच्या तीनही पक्षांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केलीय.विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या 5 जागांसाठी 27 मार्चला निवडणूक प्रक्रीया पार पडणार आहे. महायुतीकडून उमेदवारांची नावं निश्चित करून अर्जही भरण्यात आलेत.मात्र मविआच्या तीनही पक्षांनी या निवडणूकीत उमेदवार दिलेला नाहीय.याचं कारण म्हणजे विधान सभेत घटक पक्षांच्या आमदारांची संख्या कमी आहे.त्यामुळे उमेदवार दिला तरी मविआच्या उमेदवाराला यश मिळेल का याची शाश्वती नाहीय.त्यामुळे विरोधकांनी या निवडणुकीतून काहीशी माघार घेतल्याचं दिसतंय. त्यामुळे विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होणार आहे.

Add Zee News as a Preferred Source

विधानसभेतील सध्याचं संख्याबळ

भाजप - 132 
शिवसेना - 57
राष्ट्रवादी - 41
काँग्रेस - 16
शिवसेना UBT - 20
राष्ट्रवादी SP -  10

संख्याबळाच्या बाबतीत मविआ महायुतीच्या खूप मागे असल्याने मविआने उमेदवार देण्याचं धाडस केलेलं नाहीय. महायुतीचे विधान परिषदेचे उमेदवार कोण?

संजय केनेकर - भाजप
दादाराव केचे - भाजप
संदीप जोशी - भाजप
चंद्रकांत रघुवंशी - शिवसेना
संजय खोडके - राष्ट्रवादी काँग्रेस

यांना उमेदवारी दिली. खरं तर संजय खोडके हे स्पर्धेतलं नाव नव्हतं शिवाय सुलभा खोडके या विधानसभेत होत्या. पण झिशान सिद्दीकी, संग्राम कोते पाटील, आनंद परांजपे यांची आघाडीवरील नावं मागं पडली आणि संजय खोडकेंच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. महायुतीचे हे पाच उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात आहेत. विरोधकांनी उमेदवार न दिल्यामुळे या उमेदवारांचा विजय निश्चित मानला जातोय.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More