Pagdi System: पागडी म्हणजे नेमकं काय? नाव कसं पडलं? कशी झाली सुरुवात? नव्या नियमानंतर कशी चालणार यंत्रणा? A टू Z माहिती!

Pagdi system New Law: या यंत्रणेमुळे घरमालकांना खूप कमी भाडे मिळते, त्यामुळे इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी पैसे नसतात.

प्रविण दाभोळकर | Updated: Dec 12, 2025, 02:21 PM IST
Pagdi System: पागडी म्हणजे नेमकं काय? नाव कसं पडलं? कशी झाली सुरुवात?  नव्या नियमानंतर कशी चालणार यंत्रणा? A टू Z माहिती!
पगडी सिस्टिम

Pagdi system New Law: पागडी सिस्टिम ही मुंबईत जुनी असलेली ही एक विशेष भाडे व्यवस्था आहे. यात भाडेकरू घरमालकाला मोठी एकरकमी रक्कम म्हणजेच पागडी देतो आणि बदल्यात खूप कमी भाडे देऊन वर्षानुवर्षे राहण्याचा अधिकार मिळतो. भाडेकरू हे घर दुसऱ्याला विकू किंवा भाड्याने देऊ शकतो, ज्यातून नवीन पगडी मिळते.

Add Zee News as a Preferred Source

या पद्धतीमुळे कोणत्या समस्या येतात?

या यंत्रणेमुळे घरमालकांना खूप कमी भाडे मिळते, त्यामुळे इमारतीची दुरुस्ती करण्यासाठी पैसे नसतात. इमारती जुने आणि धोकादायक होतात. पुनर्विकासात भाडेकरू आणि मालक यांच्यात वाद होतात, कारण दोघांना आपला हक्क कमी मिळेल अशी भीती वाटते.

पुनर्विकास का थांबला?

मुंबईत हजारो जुन्या इमारती पागडी पद्धतीच्या आहेत. भाडेकरूंना नवीन घरात योग्य जागा मिळेल का याची शंका, तर मालकांना योग्य मोबदला मिळेल का याची चिंता भेडसावतेय. यामुळे न्यायालयात खटले वाढले आणि पुनर्विकास रखडल्याचे दिसून येत आहे.

नवीन नियामक चौकट काय आहे?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार पगडी इमारतींसाठी स्वतंत्र नियम बनवले जाणार आहेत. यात भाडेकरू आणि घरमालक दोघांचे हक्क सुरक्षित राहतील, पुनर्विकास सोपा आणि पारदर्शक होणार आहे.

नवीन नियमांमधील मुख्य तरतुदी काय?

भाडेकरूंना त्यांच्या सध्याच्या जागेएवढे क्षेत्रफळ (FSI) मिळणार आहे. घरमालकांना जमिनीच्या मालकीनुसार FSI मिळेल तर गरीब भाडेकरूंना मोफत घर बांधण्यासाठी अतिरिक्त प्रोत्साहन FSI दिले जाणार आहे. 

कोणाला जास्त फायदा होईल?

पगडी सिस्टिमच्या नव्या कायद्यानुसार दोघांना संतुलित फायदा होईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. भाडेकरूंना मालकी हक्काचे नवीन घर मिळून भीती दूर होणार आहे. घरमालकांना योग्य मोबदला आणि प्रोत्साहन मिळणार आहे. ज्यामुळे ते पुनर्विकासाला तयार होतील. एकूणच जुनी धोकादायक इमारती नव्या होऊन मुंबईच्या घरांच्या समस्येत मदत होणार आहे.

पागडी नाव कसं पडलं? कशी झाली सुरुवात?

पगडी पद्धतीला पगडी हे नाव पडण्यामागचे मुख्य कारण हे आहे की, भाडेकरू घरमालकाला दिलेली मोठी एकरकमी रक्कम (प्रिमियम किंवा डिपॉझिट) ही सामान्य भाड्याच्या वरची (on top) असते.भारतीय संस्कृतीत पगडी (फेटा) हे डोक्यावर घालतात, म्हणजे ते वरच्या बाजूला असते. त्याचप्रमाणे ही रक्कम भाड्याच्या व्यतिरिक्त आणि वरची असल्याने तिला पगडी आणि कालांतराने पागडी म्हणून ओळखले जाऊ लागले.  ही पद्धत ब्रिटिश काळात सुरू झाली, ज्यात कर चुकवण्यासाठी किंवा विक्रीऐवजी भाडे ट्रान्सफर दाखवण्यासाठी अशी एकरकमी रक्कम दिली जायची. ही रक्कम रोख स्वरूपात असल्याने आणि करांच्या बाहेर राहण्यासाठीही उपयुक्त ठरली.आजही मुंबईत ही पद्धत प्रचलित आहे, जिथे नवीन भाडेकरू मागील भाडेकरूकडून पागडी घेऊन हक्क घेतो आणि घरमालकाला त्यातील वाटा देतो.

FAQ

१. प्रश्न: पगडी पद्धत नेमकी काय आहे?

उत्तर: पगडी पद्धत ही मुंबईतील जुनी भाडे व्यवस्था आहे. यात भाडेकरू घरमालकाला मोठी एकरकमी रक्कम (पगडी) देतो आणि बदल्यात खूप कमी भाडे देऊन आयुष्यभर राहण्याचा हक्क मिळवतो. भाडेकरू हे घर दुसऱ्याला विकू किंवा भाड्याने देऊ शकतो, ज्यातून नवीन पगडी मिळते.

२. प्रश्न: पगडी पद्धतीमुळे मुंबईत कोणत्या मुख्य समस्या निर्माण झाल्या आहेत?

उत्तर: घरमालकांना खूप कमी भाडे मिळते, त्यामुळे इमारतीची देखभाल आणि दुरुस्ती होत नाही. अनेक इमारती जुने व धोकादायक झाल्या आहेत. पुनर्विकासात भाडेकरू आणि मालक यांच्यात हक्कांबाबत वाद होतात, ज्यामुळे हजारो इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे.

३. प्रश्न: महाराष्ट्र सरकारच्या नवीन नियामक चौकटीमुळे कोणाला फायदा होईल?

उत्तर: नवीन नियमांमुळे भाडेकरू आणि घरमालक दोघांनाही संतुलित फायदा होईल. भाडेकरूंना पुनर्विकासात मालकी हक्काचे नवीन घर मिळेल, तर घरमालकांना योग्य मोबदला आणि प्रोत्साहन मिळेल. एकूणच जुनी धोकादायक इमारती नव्या होऊन मुंबईतील गृहनिर्माण समस्या कमी होण्यास मदत होईल.

About the Author

Pravin Dabholkar

"प्रवीण सुरेश दाभोळकर हे 'झी 24 तास' डिजिटलमध्ये चीफ सब एडीटर पदावर कार्यरत आहेत त्यांना मीडिया क्षेत्राचा 14 वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी प्रिंट मीडियातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे त्यांना लेखन आणि रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. तेव्हापासून त्यांनी प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल मीडियासह विविध माध्यमांमध्ये काम केले आहे. संशोधनात्मक अहवाल आणि फिचर रायटिंगकडे त्यांचा कल आहे. वाचकांना माहिती नसलेल्या कथा लोकांसमोर आणण्याची त्यांना आवड आहे. हे करीत असताना सविस्तर तपशील आणि अचूकतेकडे त्यांची कटाक्षाने नजर असते. फावल्या वेळात प्रविण आपल्या आनंदासाठी फिरणे, नवीन गोष्टी आत्मसात करणे आणि सामाजिक कार्यात गुंतलेले असतात. त्यांचे लेखन अनेकदा सामाजिक न्यायाच्या समस्यांबद्दलची त्यांची उत्कटता दर्शवते. तसेच आपल्या लेखणीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक प्रभाव पाडण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात."

...Read More