थंडी, ऊन, वारा आणि पाऊस... राज्यात एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव; कधीपासून वाढणार गारठा?

Maharashtra Weather News : राज्यात ढगाळ वातावरण. कडाक्याच्या थंडीची वाट पाहताय? हवामान विभागानं दिलेला इशारा पाहून काहीशी चिंता वाटेल.   

सायली पाटील | Updated: Dec 13, 2024, 08:10 AM IST
थंडी, ऊन, वारा आणि पाऊस... राज्यात एकाच वेळी सर्व ऋतूंचा अनुभव; कधीपासून वाढणार गारठा?
Maharashtra Weather news win ter temprature to drop down from sunday latest update konkan vidarbha Mumbai

Maharashtra Weather News : पश्चिमी झंझावात आणि उत्तरेकडून वायव्येच्या दिशेला येणाऱ्या वाऱ्यांमुळे राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे. उत्तरी राज्यांच्या पर्वतीय क्षेत्रांमध्ये होणारी हिमवृष्टी आणि त्यातच मैदानी क्षेत्रांमधील तापमान घट या सर्व बदलांचा परिणाम देशाच्या उर्वरित भागांमधील हवामानावर होताना दिसत आहे. उत्तरेकडून येणाऱ्या या शीतलहरींमुळे मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र गारठलेला असतानाच राज्यातील किमान आणि कमाल तापमानात काही बदल अपेक्षित असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मागील 48 तासांपासून बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे देशातील दक्षिण किनारपट्टी क्षेत्र प्रभावित होण्यासमवेत महाराष्ट्रावरही ढगांचं सावट पाहायला मिळत आहे. ज्यामुळं शनिवारपासून गारठा अंशत: कमी होऊन राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे. रविवारी या बदलांमुळं तापमानवाढ अपेक्षित असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे. ज्यामुळं आठवड्याचा शेवट बोचऱ्या थंडीनं होणार नसला तरीही गुलाबी थंडी मात्र हजेरी लावताना दिसेल ही बाब नाकारता येत नाही. 

हेसुद्धा वाचा : भराडी देवीनं कौल देताच ठरली आंगणेवाडीच्या यात्रेची तारीख; यंदा 'या' दिवसापासून सुरू होणार उत्सव

कमी दाबाच्या पट्ट्यामुळं तामिळनाडूच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून दक्षिणेकडून येणारे हे बाष्पयुक्त वारे राज्यात येऊन रविवारपासून ढगाळ वातावरणाचा प्रभाव वाढताना दिसणार आहे.  या वातावरणाचा सर्वाधिक प्रभाव सातारा, सांगली, सोलापूर आणि धाराशिवमध्ये दिसून येणार आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील पाच दिवसांमध्ये किमान तापमानात 3 ते 4 अंशांनी वाढ होणार असून, यामुळं थंडीचा कडाका कमी होणार आहे. 

 

About the Author

Sayali Patil

सायली पाटील या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर पदावर कार्यरत असून, त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 11 वर्षांचा अनुभव आहे. त्यांनी 'लोकमत', 'लोकसत्ता' या वृत्तपत्रांसाठी काम केलं. 'लोकसत्ता'मधील 'VIVA' या जीवनशैली विषयावर आधारित पुरवणीसाठी त्यांनी लिखाण केलं पुढे त्यांनी लोकसत्ता डिजीटलसाठी काम केलं. त्यांनी 'एबीपी माझा' च्या डिजीटल टीमसोबत कामाचा अनुभव घेत 2021 मध्ये पुन्हा एकदा 'झी 24 तास डिजीटल'मध्ये रुजू होत विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं. मनोरंजन आणि Lifestyle विषयांतील सुरुवातीचा अनुभव आणि त्यानंतर राजकारण, आरोग्य, प्रवास, राज्यस्तरीय बातम्यांमध्येही त्यांचा हातखंड आहे. सिनेमांचं समीक्षण, राष्ट्रीय स्तरावरील वृत्त, जागतिक स्तरावरील घडामोडी, हवामान वृत्त आणि खगोलशास्त्राश, पुरातत्त्वं विभागाच्या संशोधनासंदर्भातील बातम्यांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. भटकंती, सिनेमा, विज्ञान, खाद्यसंस्कृती हे त्यांच्या विशेष आवडीचे विषय आहेत. 

...Read More