Raj Thackeray challenge to Nishikant Dubey: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपा खासदार निशिकांत दुबेंना जाीहर आव्हान दिलं आहे. तू मुंबईत आल्यानंतर समुद्रात बुडवून मारेन अशा शब्दांत राज ठाकरेंनी मिरा रोडमधील सभेत इशारा दिला आहे.
)
Raj Thackeray challenge to Nishikant Dubey: मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भाजपा खासदार निशिकांत दुबेंना जाीहर आव्हान दिलं आहे. तू मुंबईत आल्यानंतर समुद्रात बुडवून मारेन अशा शब्दांत राज ठाकरेंनी मिरा रोडमधील सभेत इशारा दिला आहे. निशिकांत दुबे यांनी मराठी लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर यावं, त्यांना आपटून आपटून मारू अशी धमकी दिली होती. त्यावरुन राज ठाकरेंनी संताप व्यक्त करत मुंबईत येण्याचं आव्हानच दिलं. माज घेऊन अंगावर आला तर ठेचायचा म्हणजे ठेचायचाच असा आदेशही त्यांनी देऊन टाकला.
"मराठी माणसांना आपटून आपटून मारु असं म्हणाला. त्याच्यावर केस झाली का? हिंदी चॅनेलवाल्यांनी काही दाखवलं का? कसे असतात ते पाहा. तू आम्हाला आपटून आपटून मारणार दुबे. मी दुबेलाच सांगतो, तू मुंबईत ये. मुंबईतील समुद्रात बुडवून बुडवून मारु (दुबे तुम मुंबई मे आ जाओ, मुंबई के समुंदरमे डुबे डुबे कर मारेंगे)," असं आव्हानच राज ठाकरेंनी दिलं आहे.
“हिंदी भाषिकांना मुंबईत मारणाऱ्यांनो, जर हिंमत असेल तर महाराष्ट्रात उर्दू भाषिकांना मारून दाखवा. आपल्या घरात तर कुत्रादेखील वाघ असतो. कोण कुत्रा आणि कोण वाघ, स्वतःच ठरवा”, अशी पोस्ट दुबे यांनी एक्सवर शेअर केली होती. “मराठी लोकांनी महाराष्ट्राच्या बाहेर यावं, त्यांना आपटून आपटून मारू,” असंही त्यांनी म्हटलं होतं.
“तुम्ही काय म्हणता की मराठी बोलावं लागेल? तुम्ही कोणाची भाकरी खात आहात? येथे टाटा, बिर्ला, रिलायन्स आहेत. मात्र, महाराष्ट्रात कोणतंही युनिट नाही. टाटांनी तर पहिला कारखाना बिहारमध्ये बांधला. तुम्ही फक्त आमच्या पैशांवर जगत आहात. तुम्ही कोणता कर भरता? आणि तुमच्याकडे कोणते उद्योग आहेत, आमच्याकडे खाणी आहेत,” असंही विधान त्यांनी केलं होतं.
"कानावरती मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच. छोटा प्रसंग होता तो... तिथे पाणी प्यायला त्या हॉटेलमध्ये गेले तेव्हा त्या माणसाने विचारलं कशासाठी मोर्चा काढत आहात. तेव्हा जी बसायची होती ती बसली. लगेच त्या व्यापारांनी बंद पुकारला. विषय समजून न घेता काय झालंय माहिती नसताना कुठच्यातरी राजकीय पक्षाच्या दबावाखाली येऊन तुम्ही असले बंद करता. तुम्हाला काय वाटलं व्यापारी मराठी नाहीत. शेवटी आम्ही काहीतरी घेतलं तरच दुकान चालणार ना. महाराष्ट्रात राहत आहात शांतपणे राहा. आमचं काही तुमच्याशी भांडण नाही. पण इथे मस्ती करणार असाल तर महाराष्ट्राचा दणका बसणार म्हणजे बसणार," असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.
"महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांनी काल सांगितलं म्हणे तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीचे करणार म्हणजे करणार. राज्य सरकारला आत्महत्या करायचीच असेल तर त्यांनी बेशक करावी.त्यादिवशी मोर्चाच्या भीतीने त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. तुम्ही म्हणताय की हिंदी आणणार म्हणजे आणणार. मी आता तुम्हाला सांगतो की पहिली ते पाचवी पर्यंत हिंदी आणण्याचा प्रयत्न तरी करून दाखवा. दुकानच नाही तर शाळा सुद्धा बंद करणार," असा इशारा राज ठाकरेंनी दिला आहे.