मनसे जे करणार आहे तसं महाराष्ट्रात यापूर्वी कोणीच केले नाही; आदित्य ठाकरे, आशिष शेलार, वर्षा गायकवाड आणि...

मुंबईत मनसे कडून "प्रतिपालिका सभागृह" भरवण्यात येणार आहे.  महाराष्ट्रात असा राजकीय कार्यक्रम कधीच झाला नाही. यासाठी सर्व पक्षातील दिग्गज नेत्यांना निमंत्रण देण्यात आले आहे. 

वनिता कांबळे | Updated: Apr 21, 2025, 04:46 PM IST
मनसे जे करणार आहे तसं महाराष्ट्रात यापूर्वी कोणीच केले नाही; आदित्य ठाकरे, आशिष शेलार, वर्षा गायकवाड आणि...

Maharashtra Navnirman Sena : नायक चित्रपटाची कथा मुंबईत प्रत्यक्षात पहायला मिळणार आहे. एक दिवसाचा महापौर मुंबईकरांच्या समस्या सोडवणार आहे. मनसे जे करणार आहे तसं महाराष्ट्रात यापूर्वी कोणत्याच पक्षाने केलेले नाही.  मुंबईत मनसे कडून "प्रतिपालिका सभागृह" भरवण्यात येणार आहे. या सभागृहात मुंबईकरांच्या विविध समस्यांवर चर्चा होणार आहे. 

मुंबईत मनसे कडून "प्रतिपालिका सभागृह" भरवण्यात येणार आहे.  26 एप्रिल रोजी प्रतिपालिका सभागृहाचे मनसे कडून आयोजन करण्यात आले आहे.  मुंबई महानगरपालिकेचा कारभार सध्या प्रशासनाच्या वतीने चालवण्यात येत आहे.  लोकप्रतिनिधी नसल्यामुळे लोकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप मनसेच्या वतीने करण्यात आलेला आहे.  त्यामुळे मनसे कडून अशा पद्धतीने प्रतिपालिका सभागृह भरवण्यात येणार आहे.  यात प्रति महापौर ही असणार आहे.  

या "प्रतिपालिका सभागृहात" विविध विषयांवर यामध्ये चर्चा केली जाणार आहे.  याप्रती पालिका सभागृहासाठी विविध राजकीय पक्ष सामाजिक संघटना यांनाही आमंत्रण मनसेच्या वतीने देण्यात येणार आहे.  26 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता मुंबई महापालिकेच्या समोरील पत्रकार भवन येथे मनसेचे  पहिले 'प्रतिसभागृह "भरणार आहे.रस्ते,आरोग्य ,आणि आपत्कालीन व्यवस्थापन ह्या प्रश्नांवर चर्चा होणार होणार.

या प्रती पालिका सभागृहात  उपस्थित राहण्यासाठी मनसेकडून  शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे, भाजपचे मुंबई शहराध्यक्ष आशिष शेलार त्यासोबत शिवसेना शिंदे गटाचे नेते मंत्री उदय सामंत यांना निमंत्रण देण्यात आले आहेत.  त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या राखी जाधव, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे  सिद्धार्थ कांबळे, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड, समाजवादी पार्टीचे नेते आमदार रईस शेख यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे.