ST पाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला किती रुपयांचा फटका?

ST, Auto Rickshaw, Taxi Fare : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणारी बातमी आली आहे. मुंबईकरांसोबत सर्वसामान्यांना भाडेवाढीचा फटका बसलाय. लालपरीसोबत मुंबईतील रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आलीय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 24, 2025, 12:09 PM IST
ST पाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ! सर्वसामान्यांच्या खिशाला किती रुपयांचा फटका?

ST, Auto Rickshaw, Taxi Fare : नवीन वर्षांची सुरुवात महागाईने झाली आहे. मुंबईसह महाराष्ट्रातील सर्वसामान्यांना भाडेवाढीचा झटका लागलाय. एसटी प्रवाशांच्या खिशाला कात्री लागलीय. एसटी महामंडळाचा 15% भाडेवाढीचा प्रस्ताव देण्यात आला होता यावर राज्य सरकारने शिक्कामोर्तब केलाय. शनिवारी 25 जानेवारी मध्यरात्रीपासून एसटीच्या भाडेवाढ लागू होणार आहे. गेली 3 वर्षे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाडेवाढ करण्यात आली नव्हती. त्यामुळे दरवर्षी 5 टक्के प्रमाणे तीन वर्षांची 15 टक्के एसटी महामंडळानं केलीय. भाडेवाढ झाल्यामुळे राज्यातील जनतेसाठी एस.टी.चा प्रवास 60 ते 80 रुपयांनी महागणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबईकरांचाही प्रवास महागला!

एसटीपाठोपाठ रिक्षा, टॅक्सीची भाडेवाढ करण्यात आल्यामुळे मुंबईकरांचा प्रवास महागणार आहे.  नवीन वर्षात ऑटो रिक्षा, टॅक्सीच्या भाडेवाढीमुळे मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागली आहे. टॅक्सीचा दर 4 प्रति किमीने तर रिक्षाचा दर 3 प्रति किमीने वाढणार आहे. त्याचप्रमाणे टॅक्सीचा दर हा 28 वरुन 32 वर जाणार आहे, तर रिक्षाचा दर हा 23 वरुन 26 वर जाईल.

रिक्षा संघटनेने वाढत्या सीएनजी भावामुळे आणि रिक्षाच्या दुरुस्तीचा खर्च वाढल्याने चालकांला भाडे परवडत नसल्याने त्यांनी भाडेवाढीची मागणी केली होती. त्यामुळे ही भाडेवाढ करण्यात आली असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. दरम्यान यापूर्वी 2022 मध्ये भाडेवाढ झाली होती. तेव्हा 2 रुपयांने भाडेवाढ झाली होती. रिक्षा पहिला मीटर हा 21 होता त्यावरून तो 23 रुपये झाला होता आणि टॅक्सीचा दर हा 25 रुपये होता. त्यावरून तो 28 रुपये झाला होता.

 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More