विरोधी पक्षनेतेपद लांबणीवर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही घोषणा नाहीच

विरोधी पक्षनेत्याची घोषणा कधी होणार? असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत सरकारवर टीका केलीय. तसंच देवेंद्र फडणवीसांनी देखील विरोधी पक्षनेत्यावर भाष्य करत टोला लगावलाय. 

पूजा पवार | Updated: Mar 26, 2025, 08:12 PM IST
विरोधी पक्षनेतेपद लांबणीवर, अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशीही घोषणा नाहीच
(Photo Credit : Social Media)

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस होता.  तरीही विरोधी पक्षनेत्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेत्याची घोषणा कधी होणार? असा सवाल विरोधकांनी उपस्थित करत सरकारवर टीका केलीय. तसंच देवेंद्र फडणवीसांनी देखील विरोधी पक्षनेत्यावर भाष्य करत टोला लगावलाय. 

Add Zee News as a Preferred Source

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधी पक्षनेत्याविनाच पार पडण्याची शक्यता आहे. विधानसभा विरोधी पक्षनेत्याचा प्रस्ताव मविआकडून विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला होता. मात्र, विधानसभा अध्यक्षांनी याबाबत कोणतीही घोषणा केली. दरम्यान यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत भाष्य करत विरोधकांना टोला लगावला. दरम्यान यानंतर जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या हिवाळी अधिवेशनातील भाषणातील आठवण करुन देत पलटवार केला.

मविआकडून विरोधी पक्षनेत्यासाठी भास्कर जाधव यांचं नाव देण्यात आलं आहे. दरम्यान नाव देऊन देखील भास्कर जाधवांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. यावर भास्कर जाधवांनी खंत व्यक्त करत सरकारवर शरसंधान साधलं आहे. तसंच माझ्या नावाला विरोध असेल तर दुसऱ्या नावाची घोषणा करावी अशी मागणी भास्कर जाधवांनी केली आहे. 

हेही वाचा : भाडेकरुला 7 फूट खोल खड्ड्यात जिवंत गाडलं, तीन महिन्यांनी उघड झालं रहस्य; कारण ऐकून पोलीस हादरले

 

तर दुसरीकडे विरोधी पक्षनेता पदावरुन जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर आरोप केला आहे.  सरकारला विरोधी पक्षनेता नकोत्यांना त्यांच्या मनमर्जीनं सरकार चालवायचं आहे असं म्हणत आव्हाडांनी देखील टीकास्त्र डागलं आहे. हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं देखील सूप वाजणार आहे.  मात्र, अजूनही विरोधी पक्षनेत्याची घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर निशाणा साधत विरोधी पक्षनेत्याची घोषणा लवकरात लवकर करण्याची मागणी केलीय.

About the Author

Pooja Pawar

पूजा सुनील पवार या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा ५ वर्षांचा अनुभव आहे. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी सकाळ वृत्तपत्रातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. तिथे सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक समस्या इत्यादी विषयांवर बातम्या आणि फिल्ड रिपोर्टिंगचा मौल्यवान अनुभव मिळाला. त्यानंतर नवभारत पासून डिजिटल पत्रकारितेला सुरुवात केली. पुढे न्यूज १८ लोकमतमधून स्पोर्ट्स सेक्शनसाठी काम केले. सध्या झी २४ तासमध्ये डिजिटल विभागात काम करताना विशेषतः क्रीडा क्षेत्रातील घडामोडींच्या अपडेट्स आणि विश्लेषणात्मक लेख वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करते. याशिवाय राजकीय, क्राईम, लाईफस्टाईल या क्षेत्राशी निगडीत बातम्या देखील करते. फावल्यावेळेत सामाजिक उपक्रमांमध्ये योगदान द्यायला तसेच ट्रॅव्हल करून नवनवीन ठिकाण फिरण्याची आवड आहे.

...Read More