)
Bacchu Kadu Farmers Movent to meet CM : प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्त्वाखाली शेतकऱ्यांच्या भव्य मोर्चानं नागपूर- वर्धा महामार्ह रोखून धरला आणि या मोर्चानं साऱ्या राज्याचं लक्ष वेधलं. शेतकऱ्यांच्या विविध मार्गांसाठी घेण्यात आलेल्या या मोर्चाला आता अतिशय महत्त्वाचं वळण मिळताना दिसत असून, मागण्यांसाठी आता हेच शेतकरी महामार्गावरून मैदानांकडे वळण्याची चिन्हं आहेत.
नुकत्याच घडलेल्या काही घडामोडींनुसार महाराष्ट्राच्या दोन्ही मंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर, बच्चू कडू यांनी गुरुवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट घेण्याचं मान्य केलं आहे. या भेटीमध्ये कडू आणि फडणवीस यांच्यामध्ये कर्जमाफीच्या मुद्द्यासह इतरही विविध मुद्द्यांवर चर्चा होईल असं म्हटलं जात आहे. याच चर्चेच्या धर्तीवर सध्या शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन मागे घेतलं असून, जर बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही तर 31 तारखेला थेट रेल्वे रोको आंदोलन केलं जाईल असा थेट इशारा दिला आहे.
जेल भरोच्या पार्श्वभूमीवर सरकारच्या शिष्टमंडळासोबत आज प्राथमिक चर्चा झाली. या चर्चेत कर्जमाफीसह इतर महत्त्वाच्या मागण्यांवर तोडगा काढण्याबाबत चर्चा झाली असून उद्या उच्चस्तरीय बैठक घेण्यात येणार आहे.
— BACCHU KADU (@RealBacchuKadu) October 29, 2025
“जर उद्याच्या बैठकीत सकारात्मक निर्णय झाला नाही, तर ३१ ऑक्टोबर रोजी रेल रोको… pic.twitter.com/LAMGKiO0Gp
शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसह इतर मागण्यांसाठी नागपूरला सुरू असलेलं शेतकरी महाएल्गार आंदोलन आता कापूस संशोधन केंद्र शेजारील मैदानावर तिसऱ्या दिवशीही कायम आहे. बुधवार 29 ऑक्टोबरला न्यायालयाच्या आदेशानंतर आंदोलकांनी नागपूर- हैदराबाद मार्ग वाहतुकीसाठी मोकळा केला. ज्यानंतर आंदोलक शेतकरी नेते आणि सरकारचे प्रतिनिधी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि पंकज भोयर यांच्या सुमारे दीड तास खापरी जवळ महामार्गावरच चर्चा झाली. त्यानंतर आंदोलन सुरू ठेवून शेतकऱ्यांच्या प्रतिनिधी मंडळ मुंबईला मुख्यमंत्र्यांशी आज चर्चा करण्यासाठी रवाना झालं. मुंबईतील महत्त्वाच्या बैठकीत तोडगा निघाला नाही, तर शुक्रवारी थेट 'रेल रोको'चा इशाराही बच्चू कडू यांनी दिला. दरम्यान मराठा नेते जरांगे पाटील गुरुवारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत, ज्यामुळं राज्याच्या राजकारणावरही या आंदोलनाचा परिणाम होताना दिसत असून आता सत्ताधारी या आंदोलनाला शमवण्यासाठी नेमकी कोणती भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी आंदोलन काय आहे आणि ते कशासाठी सुरू झालं?
हे शेतकरी महाएल्गार आंदोलन महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी सुरू झालं आहे, ज्यात संपूर्ण कर्जमाफी हा मुख्य मुद्दा आहे. इतर मागण्यांमध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्या, जसे की कापूस उत्पादनाशी संबंधित मुद्दे आणि शेतीसंबंधी इतर सुविधा यांचा समावेश आहे.
आंदोलनाने नागपूर-वर्धा महामार्ग कसा रोखला आणि सध्या काय स्थिती आहे?
शेतकऱ्यांच्या मोर्चाने नागपूर-वर्धा महामार्ग पूर्णपणे रोखला होता, ज्यामुळे वाहतुकीत मोठा व्यत्यय आला. बुधवार 29 ऑक्टोबरला न्यायालयाच्या आदेशानंतर आंदोलकांनी नागपूर-हैदराबाद मार्ग (ज्यात वर्धा मार्गाचा समावेश) वाहतुकीसाठी मोकळा केला.
बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट कधी आणि कशाबाबत होणार?
गुरुवारी रोजी मुंबईत बच्चू कडू यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली किंवा होणार आहे. या बैठकीत कर्जमाफीचा मुख्य मुद्दा आणि शेतकऱ्यांच्या इतर विविध मागण्यांवर चर्चा होईल.