)
School Holiday: भारतीय हवामान विभागाने नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचं जाहीर केलं आहे. महाराष्ट्रातून ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस माघारी फिरेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 24 जूनला केरळमधून भारतात प्रवेश केल्यानंतर 29 जूनला पावसाने संपूर्ण देश व्यापला. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने शनिवारपासून मुंबईसह महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. यामुळे राज्यातील अनेक शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती. दरम्यान मंगळवारीही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
पुढील 24 तासात रायगड व पुणे घाट परिसराला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सातारा घाट या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. NDRF आणि SDRF यांनी आपत्कालीन परस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.
पुढील २४ तासात रायगड व पुणे घाट परिसराला रेड अलर्ट तर पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रत्नागिरी आणि सातारा घाट या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. NDRF आणि SDRF यांनी आपत्कालीन परस्थितीकरिता सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या असल्याचे राज्य… pic.twitter.com/tQi4VS0VsT
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) September 15, 2025
बीड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बहुतांश तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. अनेक नद्या नाल्यांना महापूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पावसाचा जोर कायम राहणार असल्याने बीड जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व खासगी आणि सरकारी शाळा, अंगणवाडी, आश्रम शाळा, महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉनसन यांनी जाहीर केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जर हवामानाची स्थिती अशीच राहिली तर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करता उद्या 16 सप्टेंबर रोजी मुंबईतील शाळा बंद राहण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट आणि मुसळधार पाऊस आणि वादळाच्या शक्यतेमुळे मुंबई, ठाणे, रायगड, पुणे आणि रत्नागिरी यासारख्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना शाळांना सुट्टी मिळण्याची शक्यता आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा कऱण्यात आलेली नाही.
बृहमुंबई महानगरपालिकेने अद्याप या भागातील शाळांना सुट्टी जाहीर केलेली नाही. पुढील सूचना आणि तपशीलांसाठी विद्यार्थी आणि पालकांनी शाळा व्यवस्थपनाशी संपर्क साधणं गरजेचं आहे.
FAQ
1) पावसामुळे सुट्टी जाहीर झाल्यास शाळा कशा हाताळतात?
ऑनलाइन शिक्षण: पावसामुळे दीर्घ सुट्टी असल्यास शाळा ऑनलाइन वर्ग आयोजित करू शकतात.
अभ्यास पूर्ण करणे: सुट्टीदरम्यान विद्यार्थ्यांना गृहपाठ किंवा प्रोजेक्ट्स दिले जाऊ शकतात.
परीक्षा: मान्सूनमधील नियोजित परीक्षा (उदा. फॉर्मेटिव्ह अॅसेसमेंट) सुट्टीमुळे पुढे ढकलल्या जाऊ शकतात.
2) पालक आणि विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी?
हवामान अपडेट्स: स्थानिक हवामान खात्याच्या सूचना तपासा (उदा. IMD चे रेड/ऑरेंज अलर्ट).
शाळेच्या सूचना: शाळेच्या व्हॉट्सअॅप ग्रुप, ईमेल किंवा वेबसाइटवर सुट्टीच्या घोषणा तपासा.
सुरक्षा: पूर किंवा पाणी साचलेल्या भागातून प्रवास टाळा.
3) खाजगी शाळांचे नियम वेगळे असतात का?
खाजगी शाळांना सरकारी नियमांचे (महाराष्ट्र खाजगी शाळा कर्मचारी नियमावली १९८१) पालन करावे लागते. तथापि, काही खाजगी शाळा स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने अतिरिक्त सुट्ट्या जाहीर करू शकतात.