गेल्या 5 महिन्यांपासून एसटी गावात येत नसल्यानं; 'या' गावात विद्यार्थ्यांनी एसटी आगारातच भरवली शाळा

गावात एक महिन्यापासून पारडी-तळेगांवात बस फिरकली नाही. आगार प्रमुखाला याबाबत विचारले असता पारडी गावाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. 

नेहा चौधरी | Updated: Jul 14, 2025, 10:31 PM IST
गेल्या 5 महिन्यांपासून एसटी गावात येत नसल्यानं; 'या' गावात विद्यार्थ्यांनी एसटी आगारातच भरवली शाळा

वर्ध्यात विद्यार्थ्यांनी चक्क एसटी आगारातच शाळा भरवली. वर्ध्याच्या तळेगाव एसटी आगारात ही शाळा भरली.  गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गावात एसटी येत नसल्यानं विद्यार्थी आणि पालक संतापलेत. 

Add Zee News as a Preferred Source

वर्ध्यात विद्यार्थ्यांनी एसटी आगारातच भरवली शाळा

4-5 महिन्यांपासून एसटी गावात येत नसल्यानं संताप

वर्ध्याच्या एसटी डेपोमध्ये शाळा भरवत विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून गावात एसटी येत नसल्यानं विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले होते. गावात एसटी येत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाता येत नाहीये. वर्धा डेपोत वारंवार निवेदन देऊनही एसटी सुरू न केल्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट एसटी डेपोमध्येच शाळा भरवली.

गावात एक महिन्यापासून पारडी-तळेगांवात बस फिरकली नाही. आगार प्रमुखाला याबाबत विचारले असता पारडी गावाच्या रस्त्याचे काम सुरू आहे. तसंच पावसामुळे रस्त्यावर खड्डे पडले असल्यामुळे या रस्त्यावरून एसटी जाऊ शकत नाही. त्यामुळे पर्यायी रस्त्यावरून बस सुरू असल्याची माहिती वर्धा एसटी डेपोकडून देण्यात आलीय. 

गावात बस येत नाही म्हणून विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. निवेदन देऊनही विद्यार्थ्यांकडे कुणाचं लक्ष नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी थेट डेपोत शाळा भरवली. त्यामुळे आता तरी विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊन त्यांची शाळेत जाण्याची व्यवस्था करण्यात यावी. एवढीच माफक अपेक्षा या विद्यार्थ्याची आहे. 

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More