)
Business Hub In Thane: भारतातील पहिली बुलेट ट्रेन असलेल्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू आहे. महाराष्ट्रातील हा पहिलाच बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. राज्यात बुलेट ट्रेनचे चार स्थानके असणार आहेत. इतकंच नव्हे तर बुलेट ट्रेनच्या ठाण्यातील स्थानकाजवळ बिझनेस हब होणार आहे. बुलेट ट्रेन स्थानकाभोवती 1300 एकरांहून अधिक भागात बिझनेस हब उभारण्याची तयारी सुरू आहे.
मंगळवारी ठाणे महापालिकेने महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम 1966 अंतर्गंत ठाणे बुलेट ट्रेन स्थानकाभोवतीच्या बिझनेस हबबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. ठाण्यातील दाटीवली येथे हे बुलेट ट्रेनचे स्थानक होतंय. या स्थानकाभोवतीच्या 1,300 एकर क्षेत्रासाठीचा स्थानिक विकास आराखडा ठाणे महानगरपालिका तयार करत आहे.
बिझनेस हबसाठी या आराखड्यात महापालिका हद्दीतील दाटीवली, म्हातरडी, बेटवडे आणि आगासन या गावांचाही काही भाग आहे. तसंच, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीतील ऐरे, कोपर, भोपर, नांदिवली टर्फ पंचानंद, कटाई आणि उसरघर या गावांचाही काही भाग आहे.
महाराष्ट्रातील पहिल्या बुलेट ट्रेनची सुरुवात BMC वांद्रे-कुर्ला कॉम्पलेक्सपासून होईल. त्यानंतर ठाणे, भिवंडी, पालघरमार्गे गुजरातमध्ये जाईल. महाराष्ट्रात बुलेट ट्रेनची चार स्थानके आहेत. ही स्थानके मुंबई, ठाणे, विरार, बोईसर अशी आहेत.
मुंबई ते अहमदाबाद हे ५०८ किमीचे किमीच्या वेगाने अवघ्या दोन तास सात मिनिटांत पार होईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातून ही बुलेट ट्रेन सुरू होऊन वापी, सुरत,
वडोदरामागें अहमदाबादला पोहोचणार असल्याचे वैष्णव म्हणाले.
गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमधून आणि दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून जाणार असून या मार्गावर मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती अशी 12 स्थानके उभारण्याची योजना आहे.
उत्तर: भारतातील पहिली बुलेट ट्रेन ही मुंबई-अहमदाबाद मार्गावर आहे. एकूण ५०८ किलोमीटर लांबीचा हा मार्ग अवघ्या २ तास ७ मिनिटांत पार होईल. काम वेगाने सुरू असून, महाराष्ट्रात चार स्थानके असतील. केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे.
उत्तर: महाराष्ट्रात चार स्थानके आहेत: मुंबई (वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स), ठाणे, विरार आणि बोईसर. ट्रेनची सुरुवात मुंबईतील बीकेसी (BKC) वांद्रे-कुर्ला संकुलापासून होईल, त्यानंतर ठाणे, भिवंडी, पालघरमार्गे गुजरातकडे जाईल.
उत्तर: एकूण १२ स्थानके असतील. यात महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, विरार, बोईसर; गुजरातमधील वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश आहे. हा मार्ग दादरा आणि नगर हवेली केंद्रशासित प्रदेशातूनही जाईल.