Ulhasnagar Beating: बारसं, हळदीसारख्या आनंदाच्या कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवणे ही सामान्य गोष्ट झालीय. पण या डीजेच्या दणदणाटामुळे लोकांना त्रास होतो, काही ठिकाणी यामुळे कानाच्या समस्या निर्माण झाल्याच्या घटनाही समोर आल्यायत. तसेच वेळेच पालन न करुन कायदा मोडल्याचे प्रकारही वारंवार समोर येतात. असाच एक प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आलाय.
हळदीच्या कार्यक्रमात डीजे वेळेत बंद केल्याच्या रागातून टोळक्यानं डीजे ऑपरेटरवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरच्या कुर्ला कॅम्प परिसरात घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
प्रेम राजबोईना असं या हल्ल्यात जखमी झालेल्या डीजे ऑपरेटरचं नाव आहे. कॅम्प नंबर 5 च्या कुर्ला कॅम्प परिसरात 18 एप्रिल रोजी हळदीचा कार्यक्रम होता. त्याठिकाणी डीजे ऑपरेटर म्हणून प्रेम हा डीजे वाजवत होता. त्याच हळदीत साहिल म्हस्के, प्रतीक क्षेत्रे आणि चेतन घाटविसावे हे तरुण नाचत होते.
नियमानुसार रात्री 10 वाजता डीजे ऑपरेटर प्रेम याने डीजे बंद केला. यावेळेस डीजे सुरू करण्यासाठी साहिल याने हुज्जत घातली. मात्र प्रेमने त्याला नकार दिल्यानं त्याने प्रतीक आणि चेतनच्या मदतीने डीजे ऑपरेटर प्रेम राजबोईना याला बेदम मारहाण करत डोक्यात दगडाने हल्ला केला.
यात प्रेम च्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने 15 टाके पडले असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.
अंबरनाथमध्ये सासरच्यांच्या जाचाला कंटाळून विवाहितेनं आत्महत्या केल्याची घटना घडलीये. आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ बनवून या विवाहितेनं तिच्या बहिणींना पाठवला आणि गळफास घेत जीवन संपवलं. यानंतर आम्हाला न्याय मिळत नाही, तोपर्यंत अंत्यविधी करणार नाही, अशी भूमिका विवाहितेच्या माहेरच्यांनी घेतली आहे.विधी राजेंद्र गायकवाड असं या मृत विवाहितेचं नाव होतं. त्यांचं राजेंद्र गायकवाड यांच्याशी 2013 साली लग्न झालं होतं. त्यांचे पती राजेंद्र हे आखाती देशामध्ये नोकरीला असून त्या सासू-सासरे दीर आणि भावजय यांच्यासह अंबरनाथ पूर्वेतील रॉयल पार्कमध्ये वास्तव्याला होत्या. मात्र मागील काही दिवसांपासून सासरचे लोक त्यांचा छळ करत होते. याच छळाला कंटाळून अखेर विधी यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगण्यात येतंय.शनिवारी सकाळी त्यांनी एक व्हिडिओ तयार करून आपल्याला कसा त्रास दिला जात आहे, हे त्यात सांगितलं आणि हा व्हिडिओ त्यांनी आपल्या बहिणींना पाठवला. त्यानंतर लगेचच गळफास घेऊन त्यांनी आपलं जीवन संपवलं. हा व्हिडिओ पाहून त्यांच्या बहिणींनी विधी यांना फोन केले असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे बहिणींनी विधी यांच्या सासरी धाव घेतली असता त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं.