मोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?

Walmik Karad : संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांनी कोणत्या आश्रमात मुक्काम केला होता, याचा खुलासा तृप्ती देसाई यांनी सांगितलंय. 

नेहा चौधरी | Updated: Jan 17, 2025, 10:56 PM IST
मोठी बातमी! वाल्मिक कराडचं दिंडोरी कनेक्शन; 'या' आश्रमात केला होता 2 दिवस मुक्काम?

Walmik Karad : वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दिंडोरीतील आश्रमात मुक्कामी होते, असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी केला.15 आणि 16 डिसेंबरला हे दोघे आश्रमात मुक्कामी असल्याचा दावा त्यांनी केलाय..दरम्यान या आरोपांना दिंडोरी आश्रमाचे प्रवक्ते आबासाहेब मोरे यांनी हे आरोप खोडून काढलेत. 

Add Zee News as a Preferred Source

फरार असताना वाल्मिकचा दिंडोरीत आश्रय?

स्वामी समर्थ केंद्रात 2 दिवस मुक्काम केल्याचा आरोप

स्वामी समर्थ केंद्रानं वाल्मिकबाबतचे आरोप फेटाळले

पवनचक्की खंडणी प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झाला होता. फरार असताना वाल्मिक कराडनं नाशिक जिल्ह्यातल्या दिंडोरीतील स्वामी समर्थ केंद्रात आश्रय घेतल्याचा आरोप होऊ लागलाय. 15 आणि 16 डिसेंबरला वाल्मिक कराड स्वामी समर्थ केंद्रात मुक्कामी असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाईंनी केलाय. सीआयडीनं स्वामी समर्थ केंद्रात छापा टाकल्याचा दावा तृप्ती देसाईंनी केलाय.

स्वामी समर्थ केंद्रानं सीआयडी छाप्याचा दावा फेटाळून लावलाय. नाशिकचे काही अधिकारी केंद्रात आले होते. त्यांनी चौकशी केल्याचा दावा स्वामी समर्थ केंद्रानं केलाय.

 

हेसुद्धा वाचा - बीडमध्ये वाल्मिकचा खंडणीखोरीचा धंदा? खंडणीसाठी वाल्मिकच्या किती टोळ्या? जाणून बसेल धक्का

 

वामी समर्थ केंद्रात रोज हजारो भाविक येतात त्यामुळं या गर्दीत कुणी आलं असेल तरी त्याची कोणतीही माहिती आपल्याकडं नसल्याचं केंद्राचं म्हणणं आहे. शिवाय त्यांनी तृप्ती देसाईंनी केलेले आरोपही फेटाळून लावलेत.
वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड उज्जैनला गेला होता. तिथून तो नाशिकमध्ये दिंडोरीत आला होता. गुन्हा करायचा आणि फरार असताना देवदर्शन करायचं असा फंडा वाल्मिक कराडनं वापरला होता. त्याच्या या देवदर्शनामुळं स्वामी समर्थ केंद्रावर नाहक आरोप झालेत.

About the Author

Neha Choudhary

नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला,  26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे. 

...Read More