मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प का झाली? धक्कादायक खुलासा; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

 टँकरमध्ये प्रोपलेन हा ज्वलनशील व स्फोटक गॅस असल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं खबरदारीच्या उपाययोजना सुरू केल्या. संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबईकडे जाणारी वाहतूक तत्काळ रोखण्यात आली. 

वनिता कांबळे | Updated: Feb 4, 2026, 08:02 PM IST
  मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प का झाली? धक्कादायक खुलासा; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Pune Expressway Traffic : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मंगळवारी आडोशी बोगद्याजवळ प्रोपलेन गॅस वाहतूक करणारा टँकर उलटल्यानं द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली.  मुंबई-पुणे महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला. 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता हा टँकर उलटला होता. मात्र 24 उलटूनही वाहने जागच्या जागी थांबली.  महामार्गावर वाहतूक कोंडी असल्यानं प्रवाशांना मनस्ताप सहन करावा. मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक ठप्प का झाली? याबाबत धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

नेमकं काय घडलं? संपूर्ण घटनाक्रम

  • 3 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता एक गॅस टँकर उलटला.
  • हा टँकर उलटल्यावर त्यातून वायूगळती सुरु झाली.
  •  महामार्ग पोलिस, स्थानिक प्रशासनाची सुमारे 40 जणांची टीम लगेचच घटनास्थळी पोहोचली.
  • उलटलेल्या गँकरमधील गळती बंद करण्याचा प्रयत्न सुरु करण्यात आला. पण, त्यात प्रॉपेलिन हे अत्यंत ज्वलनशील रसायन असल्याचे कळताच संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. 
  • छोटाही स्पार्क मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देणारा होता.
  • परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता तज्ञांना पाचारण करण्यात आले. त्यांनी पाहणी केल्यावर कुठलीही घाई करुन चालणार नाही, हे समजले. लगोलग राज्य सरकारला सतर्क करण्यात आले.
  •  राज्य सरकारने लगेचच बीपीसीएल आणि एनडीआरएफ यांना पाचारण केले.
  •  या दोन्ही यंत्रणा तेथे पोहोचून, आज पहाटे 4.30 वाजतापासून एनडीआरएफ आणि बीपीसीएल यांनी परिस्थिती हाताळण्यास सुरुवात केली.
  • आतापर्यंत दोन व्हॉल्व्ह बंद करण्यात यश आले असून, एका ठिकाणाहून लीकेज सुरु आहे. रिकामे टँकर आणून त्यात हे रसायन हस्तांतरित करण्याचे काम सुरु करण्यात आले.
  •  एक टँकर भरून झाल्यावर, आता दुसर्‍या टँकरमध्ये ते हस्तांतरित करण्यात येत आहे. प्रोपेलिनसारखे घातक रसायन असलेल्या टँकरची ही अशाप्रकारची पहिलीच घटना असल्याचे समजते.
  •  या वाहतूक कोंडीमुळे सामान्यांना झालेला त्रास आणि एकूणच भविष्यात अशी घटना घडू नये आणि घडल्यास आणखी कोणत्या प्रकारची सज्जता असावी, याबाबत चौकशी करुन शिफारसींसह सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एमएसआरडीसीला दिले आहेत.
About the Author

Vanita Kamble

वनिता सुनिल कांबळे या 'झी 24 तास' डिजिटलमध्ये सिनीयर सब एडीटर पदावर कार्यरत आहेत. न्यूज चॅनल तसेच डिजीटल मीडिया क्षेत्राचा 12 वर्षांचा अनुभव आहे.  याआधी tv9 मराठी, साम टीव्ही, जय महाराष्ट्र न्यूज चॅनल, नवराष्ट्र येथे काम केलं आहे. महाराष्ट्रातील राजकीय बातम्यांसह देश विदेशातील राजकीय घडामोडींचे बातम्यांच्या माध्यमातून सखोल विश्लेषण करतात. क्राईम, व्यवसाय, राष्ट्रीय आणि जागतिक घडामोडींचे वृत्त लिखाण करतात.   यासह पर्यटन, सायन्स, टेक्नॉलॉजी तसेच रिसर्चबेस स्टोरी करण्याची विशेष आवड.

...Read More