MARTYR Murali Naik: पेहलगाम येथील हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी ठिकाणे उद्धस्त केली. यानंतर पाकिस्तानकडून भारताच्या सीमारेषेजवळील गावांवर हल्ला करण्यात आला. पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सैन्य दलाचे 2 जवान शहीद झाले आहेत. यातील मुरली नाईक हे मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी होते. ते मूळचे आंध्र प्रदेशचे होते.
शहीद जवान मुरली नाईक यांना 9 मे 2025 रोजी पाकिस्तानशी लढताना वीरगती प्राप्त झाली. यानंतर संपूर्ण शहरावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. तसेच देशभरातून हळहळ व्यक्त केली जातेय.
पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानशी लढताना भारतीय सैन्याचे दुसरे जवान दिनेश शर्मा यांनाही वीरमरण प्राप्त झाले. गोळीबारात जखमी झाल्यानंतर शर्मा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती देण्यात आली आहे.
मुरली नाईक यांना वीरगती प्राप्त झाली. यानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त केला जातोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहीद मुरली नाईक यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने 7 मे च्या रात्री पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर सुरू केले. त्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले. खरतर हा हल्ला पाकिस्तानी सैनिक अथवा पाकिस्तानी नागरिकांवर नव्हता. तरीदेखील पाकिस्तानने हा हल्ला इगोवर घेतला आणि भारताच्या सिमेलगत गावांवर हल्ले चढवले. यानंतर भारताकडूनही त्याला जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले.
अनेक पाकिस्तानी लष्करी अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करताना दिसले. विमानतळाभोवती उच्चपदस्थ अधिकारी विमान पकडण्याचा प्रयत्न करताना दिसले. ही बातमी समोर येताच पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली. भारतीय हल्ल्यांची तीव्रता आणि अचूकता पाहून पाकिस्तानी नेतृत्वात भीती पसरली आहे. काही अधिकारी परदेशात पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानमध्ये या घटनेच्या चर्चेमुळे राजकीय आणि लष्करी गटांमध्ये प्रश्न निर्माण झाले आहेत. उच्च अधिकारी नागरिकांना युद्धात ढकलून देश सोडून गेले तर आमचे संरक्षण कोण करेल? असा प्रश्न पाकिस्तानचे नागरिक विचारतायत.
ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतातील अनेक भागात ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण भारतीय हवाई संरक्षण यंत्रणेने तातडीने कारवाई करत हे सर्व ड्रोन अडवले आणि त्यांना पाडण्यात यश मिळवले. पाकिस्तानने भारतातील अनेक संवेदनशील भागांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलाने हल्ला सुरू केला. पाकिस्तानची अनेक मोठी शहरे भारताच्या हल्ल्याच्या कक्षेत आहेत. भारतीय हल्ल्यामुळे पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानंतर लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ताब्यात घेण्यात आलंय.