Amrit Bharat Express Train: लवकरच मुंबईला पहिली अमृत भारत ट्रेन मिळणार आहे. बिहारमधील सहरसा येथून ही ट्रेन सुटणार आहे. शुक्रवारी मुंबईतील लोकमान्य टर्मिनस (एलटीटी) येथे ही ट्रेन पोहोचणार आहे. ताशी 110 ते 130 किमी असा या गाडीचा वेग आहे. त्यामुळं मुंबई ते सहरसा हा 35 तासांचा प्रवास जवळपास 4 ते 5 तासांनी कमी होण्याची शक्यता आहे. कशी आहे अमृत भारत ट्रेन जाणून घेऊया.
अमृत भारत ट्रेन आधुनिक पद्धतीने डिझाइन केलेल्या सीट्स आणि सामानाचे रॅक, मोबाइल होल्डर्ससह चार्जिंग पॉइंट्स, एलईडी लाइट, सीसीटीव्ही व सार्वजनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या ट्रेनच्या दोन्ही बाजूंना स्वतंत्र इंजिन बसवले आहेत, त्यामुळे ट्रेन परतण्यासाठी लागणारा वेळ कमी होणार आहे. अमृत भारत'च्या 50 गाड्यांचे बांधकाम सुरू असून आणखी 150 गाड्यांचे नियोजन असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
बिहार आणि उत्तर भारतातील नागरिकांसाठी ही गाडी महत्त्वाची ठरू शकते. एलटीटी हा महत्त्वाचा टर्मिनस आहे. सहारसा आणि परिसरातील नागरिकांसाठी या ट्रेनने प्रवास करणे सोयीचे ठरू शकेल. सहारसा ते एलटीटीपर्यंत धावणारी ही अमृत भारत ट्रेन दोन राज्यांना जोडणार आहे. मात्र बिहारमधून निघाल्यावर ही ट्रेन मुंबईतील एकाही स्थानकावर थांबणार नाहीये.
समस्तीपूर, मुजफ्फरपूर, दानापूर, बक्सर, दीनदयाल उपाध्याय जंक्शन या स्थानकांवर थांबणार आहे. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रातील एकाही स्थानकावर थांबा नसणार आहे.
क्लास - नॉन एसी ट्रेन
दोन्ही दिशांना इंजिन असल्याने वळविण्यासाठी वेळ लागणार नाही
सेमी ऑटोमॅटिक मॅन्युअल स्पेशल कप्लरमुळे कमी झटके.
वेगः 110 ते 130 किमी प्रतितास
एकूण डबे 20
स्लीपर 10
जनरल 10