BDD पुर्नविकास प्रकल्पातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी, MHADA कडून चावीसंदर्भात मोठी अपडेट!

Mumbai BDD Redevelopment Projects Latest Update: नायगाव, एनएम जोशी आणि वरळी बीडीडीची कामं जलदगतीने सुरु असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आलंय. 

प्रविण दाभोळकर | Updated: Apr 28, 2025, 04:14 PM IST
BDD पुर्नविकास प्रकल्पातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी,  MHADA कडून चावीसंदर्भात मोठी अपडेट!
बीडीडी पुनर्विकास

Mumbai BDD Redevelopment Projects Latest Update: मुंबईतील बीडीडीवासियांचे लक्ष  पुर्नविकास प्रकल्पाकडे लागून राहीले आहेत. त्यातील काही घरे आता तयार आहेत. या पार्श्वभूमीवर म्हाडाने अत्यंत महत्वाची अपडेट दिली आहे. पुनर्विकास प्रकल्पातील नागरिकांना कधी चाव्या मिळणार? तसेच मुंबईतील इतर पुनर्विकास प्रकल्प कुठपर्यंत आलेयत? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 

मुख्यमंत्री वॉर रुमच्या धर्तीवर आम्ही प्रोजेक्ट मॉनिटरिंग करणार आहोत.  आर्टिफिशिअल इंटेलिजन्सद्वारेदेखील म्हाडा प्रशासन आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.  म्हाडा कार्यालयात आपण आता ऑफिस नेव्हिगेटर आपण लावलेले आहेत. ज्याद्वारे कोणतं ऑफीस कुठे आहे? हे लक्षात येईल आणि त्याचा फायदा नागरिकांना होईल, अशी माहिती म्हाडा उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी दिली.  100 दिवस मिशन प्रोग्रामची तयारी पूर्ण झाली असून २ मे पर्यंत आपण सबमिशन करुन माहिती वेबसाईटवर पब्लिश केली जाणार आहे.  

15 मे पर्यंतचावी वाटप

नायगाव, एनएम जोशी आणि वरळी बीडीडीची कामं जलदगतीने सुरु आहेत. मोतीलाल नगर, अभ्युदय नगर, जीटीबी नगर, पत्राचाळ पुनर्विकास करणे असे काही निर्णय झाले आहेत. बीडीडी पुर्नविकास प्रकल्पातील काही घरं तयार आहेत. काही तांत्रिक अडचण आल्या पण यासंदर्भात प्रश्न सुटला, असे जयस्वाल म्हणाले. पुढील आठवड्यात ओसी देखील मिळेल. लॉटरी देखील झाली आहे. तयार घरांसाठी 15 मे पर्यंतचावी वाटपासंदर्भात आपण कार्यक्रम करणार असल्याची माहिती म्हाडा उपाध्यक्षांनी दिली. 

 घरांच्या किंमतीत कपात

1 लाख गिरणी कामगार पात्र झाले आहेत. मुंबईत घरे द्यावी अशी त्यांची मागणी आहे. मात्र तेवढं शक्य होणार नाही. उपमुख्यमंत्र्यांचा बैठकीत आम्ही जागांच्या चाचपणी संदर्भात चर्चा करत असल्याचे ते यावेळी म्हणाले. काही घरांसाठी आम्ही 2023 मध्ये लॉटरी केली. मात्र त्यातील काही घरं गेली नाही. अशात 2024 च्या लॉटरीमध्ये घरांची किंमत कमी करा, अशी मागणी झाली.अशात समितीच्या आधारे घरांच्या किंमतीत कपात करण्यात आल्याचे संजीव जयस्वाल म्हणाले. ईडब्ल्यूएस ते एचआयजीपर्यंतच्या किंमती कमी झाल्या. याचिका झाल्याने मी काही अधिक बोलणार नाही. मात्र लवकरच सरकारसोबत चर्चा केल्यानंतर आम्ही यासंदर्भात एक निर्णय घेऊ, असे जयस्वाल म्हणाले. 

 90 टक्क्यांपर्यंत घरं विकली जातील

इतर मंडळांची घरं पडून आहेत. मी रुजू झालो तेव्हा साधारण 19 हजार घरं रिक्त होती. आता 12 हजार 500 घरं पडून आहेत. म्हणजे 7 ते साडे सात हजार घरं गेली आहेत. आम्ही डिस्काऊंट देतोय, योजना करतोय आणि रेंटल हाऊसिंगद्वारे प्रस्ताव देतोय. अशाप्रकारे घरं जातील असं नियोजन करतोय. पुढील एक दीड वर्षात  90 टक्क्यांपर्यंत ही घरं विकली जातील असं नियोजन असल्याचे जयस्वाल म्हणाले.