'मराठी लोग गंदे...', घाटकोपरमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्या कुटुंबाला हिणवणाऱ्या गुजराती रहिवाशांची 'मनसे' स्टाईलनं जिरवली

Marathi vs Non Marathi: 'ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजवा नाहीतर.... इथे तुम्ही...' घाटकोपरमध्ये पुन्हा मराठी- अमराठी वादानं डोकं वर काढलं. 

सायली पाटील | Updated: Apr 17, 2025, 09:49 AM IST
'मराठी लोग गंदे...', घाटकोपरमध्ये नॉनव्हेज खाणाऱ्या कुटुंबाला हिणवणाऱ्या गुजराती रहिवाशांची 'मनसे' स्टाईलनं जिरवली
Mumbai news Marathi family insulted by non marathi Gujarati Marwari and jain families over Non veg eating in Ghatkopar society MNS issues warning

Marathi vs Non Marathi: मराठी आणि अमराठी वादाला मागील काही दिवसांपासून सातत्यानं हवा मिळत असून आता पुन्हा एकदा घाटकोपरमधून असंच एक प्रकरण समोर आलं आहे. जिथं नॉनव्हेज खाण्याच्या मुद्द्यावरून मराठी कुटुंबाला हिणवलं गेल्याचं आणि अपमानास्पद वागणू दिली गेल्याचं कळतात मनसे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी पोहोचत तेथील अमराठी रहिवाशांना मनसे स्टाईलनं समज दिल्याचं पाहायला मिळालं. (Mumbai Ghatkopar News)

मुंबईतील घाटकोपरमध्ये मराठी-गुजराती वाद पुन्हा पेटला. इथल्या एका सोसायटीत चार मराठी घरं आहेत. तर संपूर्ण इमारत गुजराती आहे. जिथं, गुजराती रहिवाशी मराठी कुटुंबाला त्रास देत असल्याचा आरोप होतो. 'तुम मराठी लोग गंदा है.. मच्छी मटण खाते हो' म्हणत त्या अमराठी नागरिकांनी त्रास दिला जात असल्याचा आरोप होतोय. मराठी माणसाला हिन दर्जाची वागणूक दिली जात असल्याचाही आरोप या प्रकरणात करण्यात आला आहे. या घटनेनंतर मनसेनं सोसायटीत जाऊन गुजराती, अमराठी रहिवाशांना आपल्याच शैलीत समज देत मराठी लोक गंदे.... तर हा महाराष्ट्र पण मराठी माणसाचाच आहे मग तुम्ही इथं कशाला आलात? असा खडा सवाल करत समज दिल्याचं पाहायला मिळालं. 

मराठी कुटुंबाला देण्यात आलेल्या वागणुकीसंदर्भातील माहिती मिळताच, मनसेच्या कामगार सेनेचे उपाध्यक्ष राज पार्टे यांनी सोसायटीच्या दिशेनं मोर्चा वळवत संबंधित सोसायटीतील अमराठी रहिवाशांना जाब विचारला. यावेळी तिथं मात्र आम्ही अशी भेदभावाची वागणूक दिली नसल्याचं आणि मांसाहार खाण्यावर कोणतेही बंधन आणलं जात नसल्याचं म्हणत या रहिवाशांनी संतप्त कार्यकर्त्यांसमोर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना न जुमानता मनसे कार्यकर्त्यांनी ही चार कुटुंब असतील तर त्यांच्यासाठी उभे राहणारे इथे 4000 येतील अशा शब्दांत खडे बोल सुनावले. 

मराठी माणूस चुकतोय तर त्याची चूक दाखवा, पण...

'तुमचा जो कोण शाह आहे त्याला तुमच्या भाषेत समजवा. गुजरातीत, मारवाडीत, कोणती भाषा येते त्या भाषेत समजवा. जर मराठी माणूस चुकतोय तर त्याची चूक दाखवा. पण ,दोनचार मराठी कुटुंब असतील आणि त्यांच्यावर तुम्ही दादागिरी करत असाल तर, तुमच्याकडे पैसा सगळं आहे... पण ही चार जणं आहेत ना त्यांच्यासाठी इथे 4000 येतील....तुम्ही जो शब्द वापरला, मराठी लोग गंदे है... गंदे है तो महाराष्ट्र भी गंदा हो गया.... इधर क्यू आये आप?, इथं मिळुनमिसळूनच राहावं लागेल', असं ठणकावून सांगत मनसेनं मराठी कुटुंबांची बाजू उचलून धरली.