समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवर महाराष्ट्रातील सर्वात थरारक घाट; याच घाटात दडलेल्या छुप्या गावात आहे जगप्रसिद्ध हिल स्टेशन

Written ByVanita KambleUpdated byVanita Kamble
Published: May 05, 2026, 10:09 PM IST|Updated: May 05, 2026, 10:09 PM IST

महाराष्ट्रातील सर्वात थरारक घाटात आहे कोकणातील दुसऱ्या क्रमाकांचे जगप्रसिद्ध हिल स्टेशन.  

1/9

समुद्रसपाटीपासून 2000 फूट उंचीवर असलेला महाराष्ट्रातील सर्वात थरारक घाट आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या घाटात दडलेल्या एका छुप्या गावात  जगप्रसिद्ध हिल स्टेशन आहे. जगभरातून पर्यटक येथे येतात. 

2/9

आंबा घाट असे महाराष्ट्रातील या सर्वात थरारक घाटाचे नाव आहे. रत्नागिरी आणि कोल्हापूरला जोडणारा आंबा घाट जितका थरारक आहे तो तितकाच सुंदर आहे.  

3/9

आंबा घाटातून प्रवास करताना प्रवासी हरखून जातात. या घाटातील निसर्ग सौैंदर्य लक्ष वेधून घेते. 

4/9

आंबा हे ठिकाण कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर कोल्हापूरपासून सुमारे 65 किमी आणि रत्नागिरीपासून सुमारे 60 किमी अंतरावर आहे.

5/9

आंबा घाट हे लोकप्रिय हिल स्टेशन देखील आहे. आंबा घाटातील अनेक गावांमध्ये पर्यटक थांबातात आणि येथील निसर्गसौंदर्यचाा आनंद लुटतात. मात्र, आंबा गाव सर्वात लोकप्रिय आहे. 

 

6/9

आंबा घाट हा समुद्रसपाटीपासून 2000 हजार फूट उंचीवर आहे.  हे कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात उंच ठिकाण आहे . आंबा गाव हेच जगप्रसिद्ध हिल स्टेशन आहे. 

 

7/9

आंबा गाव अतिशय सुंदर आहे. हिरवेगार डोंगर रस्त्याच्या भोवताली खोल दरी. इथं नेहमी धुकं असत. यामुळे आंबा गावात फिरताना केरळचा फिल येतो. 

8/9

आंबा गावात अनेक रिसॉर्ट आणि होम स्टे आहेत. अनेक पर्यटक आंबा गावात फिरण्यासाठी येतात.  आंबा हे थंड हवेचे हिल स्टेशन आहे. 

9/9

पश्चिम घाटामध्ये रत्नागिरी कोल्हापूरला जोडणाऱ्या आंबा घाटातून प्रवास करताना उटी मसुरी रोडचा फिल येतो. यामुळे अनेक पर्यटक निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी आंबा घाटातून प्रवास करतात.