टीम इंडियासाठी एक दोन नाही तर तब्बल 5 धोक्याचे इशारे, वेळीच सुधारले नाही तर सेमीफायनलमध्ये होणार पराभव

IND VS ENG : टी20 वर्ल्ड कप 2026 च्या सेमी फायनलचं काऊंटडाऊन आता सुरु झालं आहे. भारतीय फॅन्सचं लक्ष हे दुसऱ्या सेमीफायनलवर असून ज्यात भारत विरुद्ध इंग्लंड (IND VS ENG) यांच्यात सामना होणार आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाला स्वतःच्या कमतरतेवर काम करावं लागणार आहे. अन्यथा इंग्लंड भारतीय संघाच्या या कमतरतेचा फायदा उचलून सेमीफायनलमध्ये त्यांचा पराभव करू शकतं.   

Pooja Pawar | Mar 03, 2026, 04:56 PM IST
twitter
1/7

टीम इंडिया सुपर 8 फेरीतून झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजला पराभूत करून सेमीफायनलमध्ये पोहोचली आहे. मात्र टीम इंडियाच्या काही कमतरता जगजाहीर आहेत. त्यामुळेच त्यांना सुपर 8 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवाण्या पराभवाला समोर जावं लागलं होतं.   

twitter
2/7

आता टीम इंडिया 5 मार्च रोजी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध सामना खेळणार आहे. अशातच जर या चुका सुधारल्या गेल्या नाहीत तर मात्र निश्चितपणे इंग्लंड याचा फायदा उचलेल. इंग्लंडने यंदाच्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 7 पैकी 6 सामने जिंकली आहे. आता या कमतरता कोणत्या आहेत याविषयी जाणून घेऊयात.   

twitter
3/7

टीम इंडियाची सर्वात मोठी कमतरता ही ओपनिंग पार्टनरशिप आहे. स्पर्धेत सुरुवातीला अभिषेक आणि ईशान या सलामी जोडीने टीम इंडियाच्या फलंदाजीची सुरुवात केली होती. मात्र विरोधी संघांना ऑफ स्पिनच्या हत्याराने ही जोडी तोडण्यात यश आलं होतं. संजू सॅमसनची एंट्री मागील काही सामन्यात झाली मात्र तरीही पॉवर प्लेमध्ये विकेट्स पडताना दिसल्या. सलामी जोडीकडून टीम इंडियाला अद्याप अजून चांगली पार्टनरशिप मिळालेली नाही.   

twitter
4/7

टीम इंडियाची दुसरी कमजोर बाजू ही पॉवर प्लेमध्ये विकेट पडणं ही आहे. पॉवर प्लेमध्ये कधी एक तर कधी तीन विकेट पडताना दिसून आले. सेमी फायनलमध्ये सुद्धा हीच अवस्था राहिली तर इंग्लंडवरचा दबाव वाढेल जो टीम इंडियाला बॅकफूटवर नेऊ शकतो. अशातच पॉवर प्लेमध्ये एक चांगली सुरुवात टीम इंडियाला पुढे घेऊन जाऊ शकते.   

twitter
5/7

टीम इंडियाची तिसरी कमकुवत बाजू ही फील्डिंग आहे. टीम इंडियाची फिल्डिंग या स्पर्धेत एकदम खराब असलेली पाहायला मिळाली. टीम इंडियाने आतापर्यंत  स्पर्धेत एकूण 13 कॅच सोडलेत, जे इतर संघांच्या तुलनेत सर्वात जास्त आहेत. त्यामुळे टीम इंडियाला नॉकआउट सामन्यात फिल्डिंग चांगली करण्यावर भर द्यावा लागेल.   

twitter
6/7

अभिषेक शर्मा आणि कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म हा टीम इंडियाची कमजोरी आहे. आतापर्यंत 6 सामन्यात अभिषेक आणि सूर्याने आपल्या फलंदाजीने एक अर्धशतक ठोकले. दोघांच्या लवकर बाद झाल्याने टीम इंडियाच्या मिडिल ऑर्डरवर बरच प्रेशर येतं. अभिषेक शर्मा मागच्या सामन्यात 15 धावाकरून आउट झाला. सुरुवातीला तो सलग तीन सामन्यात डकआउट झाला होता.   

twitter
7/7

बॉलिंगमध्ये सुद्धा कमतरता पाहायला मिळाली. जसप्रीत बुमराहवर संघ अधिक निर्भर वाटला. ग्रुप स्टेजमध्ये वरुण चक्रवर्तीने चांगली गोलंदाजी केली होती, मात्र सुपर 8 मध्ये त्याच्या गोलंदाजीचा फॉर्म ढासळला. अर्शदीप सिंग सुरुवातीलाच त्याच्या स्विंगने फलंदाजांना बाद करतो पण डेथ ओव्हर्समध्ये तो खूपच महागडा ठरतो. हार्दिक पंड्या, अक्षर पटेल आणि शिवम दुबे यांच्यातही सातत्याचा अभाव आहे.  

twitter