भारताच्या 'या' रेल्वे स्टेशनवर घ्यावा लागतो पासपोर्ट आणि व्हिसा, तरच येतो प्रवेश करता

तुम्हाला माहिती आहे का की भारतातील रेल्वे स्टेशनवर ट्रेनने प्रवास करण्यासाठी व्हिसा-पासपोर्टचीही गरज लागते.   

Tejashree Gaikwad | Jan 25, 2025, 04:33 PM IST
twitter

तुम्हाला माहिती आहे का की भारतातील रेल्वे स्टेशनवर ट्रेनने प्रवास करण्यासाठी व्हिसा-पासपोर्टचीही गरज लागते. 

 

1/7

Atari Railway Station: वास्तविक, व्हिसा-पासपोर्ट फक्त विमान प्रवासासाठी आवश्यक असतो. तेही जेव्हा आपण एका देशातून दुसऱ्या देशात प्रवास करत असतो, पण तुम्हाला माहिती आहे का की भारतातील रेल्वे स्टेशनवर ट्रेनने प्रवास करण्यासाठी व्हिसा-पासपोर्टचीही गरज लागते.   

twitter
2/7

भारताची ही रेल्वे पंजाब राज्यातील अमृतसर जिल्ह्यात आहे. एकेकाळी फिरोजपूर रेल्वे स्थानकाच्या अखत्यारीतील अटारी रेल्वे स्थानकात जाण्यासाठी पाकिस्तानी व्हिसाची आवश्यकता होती.  

twitter
3/7

भारत-पाकिस्तान दरम्यान समझौता एक्स्प्रेस धावत असे. हे भारतातील शेवटचे रेल्वे स्टेशन देखील आहे. या स्थानकावर व्हिसा आणि पासपोर्टशिवाय प्रवेश करण्यास मनाई होती. त्याशिवाय प्रवास करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली.  

twitter
4/7

समझौता एक्सप्रेस भारतातून पाकिस्तानात आणि पाकिस्तानातून भारतात येत असे. ही ट्रेन भारत आणि पाकिस्तान दरम्यान प्रवास करणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी होती, मात्र आता अटारी रेल्वे स्थानकावरून जाणारी ही ट्रेन बंद करण्यात आली आहे.  

twitter
5/7

2019 मध्ये भारत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर समझौता एक्स्प्रेसही थांबवली होती. त्यामुळे आता अटारी रेल्वे स्थानकावरून कोणीही पाकिस्तानात जाऊ शकत नाही.  

twitter
6/7

समझौता एक्सप्रेस आठवड्यातून दोनदा म्हणजे सोमवार आणि गुरुवारी धावत होती.  भारतातील दिल्ली ते अटारी आणि पाकिस्तानमधील लाहोर दरम्यान ट्रेन धावायची. या ट्रेनने अमृतसर-लाहोर दरम्यानचे अंदाजे 50.2 किमी अंतर कापले.  

twitter
7/7

अटारी रेल्वे स्थानक आता बंद करण्यात आले आहे. जर तुम्ही या रेल्वे स्थानकात जबरदस्तीने प्रवेश करतांना पकडले गेले तर तुमच्यावर फॉरेनर्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. एवढंच नाही तर तुम्हाला तुरुंगात जावे लागू शकते.  

twitter