'मला लग्न करायचं होतं' बॉलिवूड अभिनेत्रीचा खुलासा
किर्तीला दाक्षिणात्य चित्रपटांच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री किर्ती खरबंदा आपल्या आगामी 'हाऊसफुल', 'पागलपंती', 'चेहरे' त्याचप्रमाणे तामिळ 'वान' अशा अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. तिला तिच्या आयुष्यात अभिनेत्री बनायचे नव्हते तर तिला विवाह बंधनात अडकायचे होते. आईएएनएस सोबत संवाद साधताना तिने हा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, 'अभिनेत्री बनण्याचे माझे स्वप्न कधीच नव्हते. मला लग्न करायचे होते आणि मुलांना जन्म देण्याची इच्छा होती. त्याचप्रमाणे भाषेच्या आधारावर मी कोणत्या चित्रपटाची निवड केली नाही.'