तुमची नोकरी गेल्यास सरकार देणार 90 दिवसांपर्यंत पैसा; 30 जून 2027 पर्यंत योजनेची डेडलाईन!

Published: Jul 07, 2026, 03:22 PM IST|Updated: Jul 07, 2026, 03:25 PM IST

उद्योग, कारखाने, उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि ESIC अंतर्गत येणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होईल. अचानक नोकरी गेल्यास काही काळासाठी आर्थिक ताण कमी होण्यास मदत होते.

ESIC Atal Beemit Vyakti Kalyan Yojana Till 30 June 2027 Claim Unemployment Benefit1/8

तुमची नोकरी गेल्यास सरकार देणार 90 दिवसांपर्यंत पैसा; 30 जून 2027 पर्यंत योजनेची डेडलाईन!

केंद्र सरकारने कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या अटल बीमित व्यक्ती कल्याण योजनेला मोठा दिलासा देत 30 जून 2027 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा उद्देश नोकरी गमावलेल्या ईएसआयसी (ESIC) सदस्यांना तात्पुरता आर्थिक आधार देणे हा आहे.

ESIC बेरोजगारी भत्ता2/8

अटल बीमित व्यक्ती कल्याण योजना म्हणजे काय?

 

ही योजना ESIC अंतर्गत विमाधारक कर्मचाऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. कंपनी बंद होणे, कर्मचाऱ्यांची कपात, आर्थिक मंदी किंवा इतर कारणांमुळे नोकरी गेल्यास काही काळासाठी आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद या योजनेत आहे.

नोकरी गेल्यास सरकारी मदत3/8

किती आर्थिक मदत मिळते?

 

पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या सरासरी दैनिक वेतनाच्या 50 टक्क्यांपर्यंत बेरोजगारी भत्ता दिला जातो. हा लाभ जास्तीत जास्त 90 दिवसांपर्यंत उपलब्ध असतो. रक्कम थेट लाभार्थ्याच्या बँक खात्यात जमा केली जाते.

ESIC Scheme Lat4/8

कोण पात्र ठरू शकतात?

 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित कर्मचारी हा ESIC मध्ये नोंदणीकृत असावा.नोकरी अनैच्छिकपणे गेली असावी.आवश्यक योगदान अटी पूर्ण केलेल्या असाव्यात. योजनेतील इतर पात्रता निकषांचे पालन करणे आवश्यक आहे.

Atal Beemit Vyakti Kalyan Yojana5/8

अर्ज कसा करायचा?

 

पात्र कर्मचारी आवश्यक कागदपत्रांसह ESIC च्या नियमानुसार अर्ज करू शकतात. मंजुरीनंतर बेरोजगारी भत्ता थेट बँक खात्यात जमा केला जातो. अर्ज करताना बँक खाते, आधार, ESIC विमा क्रमांक आणि इतर आवश्यक माहिती तयार ठेवावी.

Government Scheme6/8

कोणाला सर्वाधिक फायदा?

 

उद्योग, कारखाने, उत्पादन क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि ESIC अंतर्गत येणाऱ्या खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा मोठा लाभ होईल. अचानक नोकरी गेल्यास काही काळासाठी आर्थिक ताण कमी होण्यास मदत होते.

Employee Benefits7/8

योजनेचे महत्त्व काय?

 

बेरोजगारीच्या काळात कुटुंबाचा खर्च, घरभाडे, ईएमआय, शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागविण्यासाठी हा भत्ता उपयुक्त ठरतो. नव्या नोकरीच्या शोधादरम्यान कर्मचाऱ्यांना आर्थिक आधार मिळावा हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे.

Unemployment Benefit8/8

कर्मचाऱ्यांनी काय लक्षात ठेवावे?

 

ही योजना सर्व बेरोजगारांसाठी नसून ESIC अंतर्गत विमाधारक पात्र कर्मचाऱ्यांसाठीच लागू आहे. त्यामुळे लाभ घेण्यापूर्वी पात्रता, आवश्यक योगदान कालावधी आणि अर्ज प्रक्रिया अधिकृत ESIC मार्गदर्शक सूचनांनुसार तपासूनच अर्ज करावा.