मकर संक्रांतीला तिळगुळाची परंपरा कशी सुरु झाली? काय आहे पौराणिक कथा आणि वैज्ञानिक कारण?

Makar Sankranti 2026 : मकर संक्रांतीला तिळगुळाच्या लाडूला अतिशय महत्त्व आहे. या परंपरेमागे पौराणिक कथा तर आहेच पण वैज्ञानिक कारण देखील आहे. 

Neha Choudhary | Jan 10, 2026, 09:28 PM IST
twitter
1/9

ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांतीला सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा सण महाराष्ट्रासह देशभरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. 

twitter
2/9

प्रत्येक राज्यात हा सण वेगळ्या नावाने ओळखला जातो. तर त्यासोबत प्रत्येक राज्याची मकर संक्रांत साजरी करण्याची एक वेगळी परंपरासह प्रथा आहे.

twitter
3/9

महाराष्ट्रात मकर संक्रांतीला तिळाचा लाडू बनवण्याची परंपरा आहे. त्यामागील पौराणिक कथा आणि वैज्ञानिक कारण तुम्हाला माहितीये का?

twitter
4/9

पौराणिक कथेनुसार सूर्यदेव पुत्र शनिदेवावर खूप संतापले होते. अशात शनिदेवाने स्वगृह कुंभ राशीचे घर जाळले. त्यामुळे सूर्यदेव नाराज झाले. त्यानंतर शनिदेवाने माफी मागितल्यानंतर सूर्यदेवाचा राग शांत झाला. 

twitter
5/9

त्यावेळी सूर्यदेव म्हणाले की, सूर्यदेव जेव्हा मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा शनिदेवाच्या घरी समृद्धी आणि आनंद नांदेल. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मकर हे शनिदेवाचे आवडतं घर आहे. यानंतर शनिदेवाने सूर्यदेवाची पूजेसाठी तीळ आणि गूळचा वापर केला. 

twitter
6/9

शनिदेवाच्या या पूजेने सूर्यदेव प्रसन्न झाले आणि तेव्हापासून सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांती साजरी करण्यात येते आणि तेव्हापासून तिळगुळाचे लाडू बनवण्याची प्रथा सुरु झाली.

twitter
7/9

वैज्ञानिक कारण म्हणजे तीळ हे अतिशय पौष्टिक आहे. तिळामध्ये कॅल्शियम, मँगनीज, लोह, फॉस्फरस, सेलेनियम, ब गटातील जीवनसत्त्वे फायबर, अँटीऑक्सिडंट्स  आणि तंतुमय पदार्थही असतात. 

twitter
8/9

मधुमेही रुग्णासाठी तीळ उपयुक्त, दात मजबूत होतात, रोग प्रतिकारशक्ती वाढते, हाडे मजबूत होतात. हृदय आणि रक्तवाहिन्यासाठी तीळ खाणे चांगले मानले जाते. तर तीळ हे उष्ण असतात आणि मकर संक्रांत तीळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असतं.    

twitter
9/9

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. याचा झी 24 तासशी कोणताही संबंध नाही तसेच आम्ही याला दुजोरा देत नाही.)  

twitter