'कोकणी रान माणूस' साजरा करतोय अनोखा स्वातंत्र्य दिन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साजरा होतोय निसर्गाच्या सान्निध्यातील १५ ऑगस्ट
मुंबई : १५ ऑगस्टला होणारे झेंडावंदन हा आपल्या साऱ्यांसाठीच एक आनंदाचा आणि अभिमानाचा सोहळा असतो. यंदाही झेंडावंदनाचा हा कार्यक्रम होणार आहेच, झेंडा डौलाने फडकणार आहेच पण उपस्थितांची लगबग, गर्दी नसणार. काही ठिकाणी ऑनलाइन सोहळा होईल तर काही ठिकाणी मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीत हा सोहळा साजरा होईल.
भारताचे वेगळेपण आहे ते आपल्या विविधतेमध्ये. तर निसर्गाचे वैभव आहे ते जैवविविधतेमध्ये. देशाची विविधतेतील एकता आणि निसर्गाची जैवविविधता याला सलाम करण्याचा प्रयत्न यामधून केला आहे.