Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी सुरू झालेल्या लाडकी बहीण योजनेतून लाखो बहिणी अपात्र. काय आहे त्यामागचं कारण?
1/8Ladki Bahin Yojana : राज्यातील महिलांना आर्थिक पाठबळ देण्याचा मनसुबा केंद्रस्थानी ठेवत महाराष्ट्र राज्य शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केली. मात्र याच योजनेतून लाखो महिला पुनपडताळणी प्रक्रियेत अपात्र ठरल्याचं समोर आलं.
2/8योजनेअंतर्गत अपात्रतेसाठीसुद्धा शासनानं काही निकष निर्धारित करत त्या धर्तीवर योजनेतील लाभार्थींची पुनर्पडताळणी आणि ई केवायसी करण्यात आली. ज्यातून अपात्रतेची कारणं आणि आकडेवारीसुद्धा समोर आली.
3/8आर्थिक उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक असून किंबहुना आयकर भरत असूनही अनेक नोकरदार महिलांनीसुद्धा योजनेला लाभ घेतला. अशा 10 लाख महिलासुद्धा अपात्र.
4/8कुटुंबातील एक सदस्य नोकरी करत असल्याचं दाखवत 4.5 लाख महिलांनी आर्थिक लाभ घेतला, ज्या आता अपात्र ठरल्या आहेत.
5/8आर्थिक सुबत्ता असून किंबहुना अगदी 4 चाकी वाहन असणाऱ्या दोन लाख महिलांनीही योजनेसाठी नावनोंदणी केल्यानं अशा महिला आता योजनेस अपात्र ठरल्या आहेत.
6/8लाडकी बहीण योजनेमध्ये तब्बल 16 हजार पुरुषांनी महिला म्हणून अर्ज केल्यानं असे अर्ज बाद करण्यात आले.
7/821 वर्षांहून कमी वय असणाऱ्या जवळपास 74 हजार महिलांनी या योदजनेसाठी अर्ज केल्याची बाब पडताळणीतून उघड झाली. योजनेच्या लाभार्थींपैकी 2 लाख महिला या 65 वर्षांहून अधिक वयाच्या असल्यानं त्यासुद्धा या योजनेस पात्र नाहीत.
8/8सर्वात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 62 वाढीव 5 महिन्यांचा वेळ देऊनही त्यांनी ई-केवायसी केली नाही. या प्रक्रियेला मुदतवाढ देऊनही त्याची पूर्तता न झाल्यानं अपात्र महिलांचा आकडा वाढला.