)
Dussehra 2025 : रावण.... लंकेश किंवा लंकानरे, लंकाधिपती अशीही त्याची नावं. रामायण या महाकाव्यातील हे एक महत्त्वाचं पात्र. कैक शास्त्र, पुराणं, वेदांचं ज्ञान असणारा हा रावण अतिशय बलशाली आणि महापराक्रमी होता. असुरांचा राजा, म्हणून त्याचा उल्लेख केला जातो.
एक असा राजा, ज्याची 10 मुखं आहेत आणि 20 भुजा अर्थात 10 तोंडं आणि 20 हात आहेत. याच कारणामुळं हा रावण, दशमुखा, दशग्रीव म्हणूनही ओळखला जात होता. रावणाच्या या दहा मुखांचीही काही प्रतिकं आहेत. ज्यातून विविध गोष्टी प्रतीत होतात. त्याची 10 मुखं 6 शास्त्र आणि 4 वेदांचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं. या कारणास्तव रावण सर्वात बुद्धिमान राजा म्हणूनही गणला गेला.
वाल्मिकी रामायणानुसार रावणाचा जन्म दहा तोंडं, मोठी दाढ, 20 हात अशा रुपात झाला होता. त्याचा वर्ण गडद सावळा असून दहा हातांमुळं त्याला दशग्रीव असं नाव देण्यात आलं होतं. याच कारणामुळं रावणाला दशानन, दश्कंधन असंही म्हणतात.
रावणानं ब्रह्मदेवाला प्रसन्न करण्यासाठी म्हणून कैक वर्षांची कठोर तपश्चर्या केली होती. याचदरम्यान त्यानं 10 वेळा आपलं शीर कापलं. मात्र तो जेव्हा शिरच्छेद करी तेव्हा तिथं नवं शीर येई. अशा रितीनं रावण तपस्या अखंडित ठेवण्यात यशस्वी ठरला.
अखेर ब्रह्मदेव रावणाच्या या तपश्चर्येनं प्रसन्न झाले आणि 10 शिरच्छेद केल्यानंतर प्रकट होत त्याला हवा तो वर मागण्यास सांगितलं. यावर रावणानं अमरत्वाचं वरदान मागितलं. ब्रह्मदेवानं हे वरदान दिलं मात्र अमरत्वाचं आकाशीय अमृत दिलं. जे रावणानं नाभीमध्ये संग्रहित केलं. एकिकडे रावणाच्या मुखांची ही कथा असतानाच काही संदर्भांमध्ये हे शीर नकारात्मकतेचं प्रतीक असल्याचं म्हटलं जातं. मात्र लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे रावणाची 10 मुखं हेच दर्शवतात की तुमच्याकडे गरजपेक्षा जे काही जास्त आहे तर त्यांचं काहीही ध्येय्य नाही. या सर्व इच्छविनाशाच्याच दिशेनं जातात.
(वरील माहिती उपलब्ध संदर्भांवर आधारित असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)
दशहरा 2025 कधी साजरा केला जाईल?
दशहरा किंवा विजयादशमी हा सण 2025 मध्ये 2 ऑक्टोबर, गुरुवार रोजी साजरा केला जाईल. दशमी तिथी 1 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 7.01 वाजता सुरू होईल आणि 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7.10 वाजता संपेल.
रावणाची दहा मुखं काय प्रतीक आहेत?
रावणाची दहा मुखं विविध अर्थाने प्रतीकात्मक आहेत. एका अर्थाने ती सहा शास्त्रे (न्याय, वैशेषिक, सांख्य, योग, मीमांसा, वेदांत) आणि चार वेद (ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद) यांचे प्रतीक आहेत, ज्यामुळे रावणाला विद्वान आणि बुद्धिमान राजा मानले जाते.
वाल्मीकी रामायणानुसार रावणाचा जन्म कसा झाला?
वाल्मीकी रामायणानुसार, रावणाचा जन्म दहा तोंडं, मोठी दाढ आणि वीस हात असलेल्या रुपात झाला होता. त्याचा वर्ण गडद सावळा असून, दहा हातांमुळे त्याला 'दशग्रीव' हे नाव पडले.