हिंदू धर्मात अनेक रिती नियम सांगण्यात आलंय. त्यासोबत प्रत्येक समाजाच्या आपल्या पंरपरा आणि प्रथा असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील गोष्टींबद्दलही शास्त्रात काही नियम सांगण्यात आले आहे. त्यातील महत्त्वाचा नियम हा आंघोळबद्दलही सांगण्यात आलंय. घरातील जुनी आणि मोठी मंडळी आपल्या काम सांगतात किंवा लहानपणापासून एक सवय लावतात. आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर ठेवा अशी शिकवण देतात. विवस्त्र आंघोळ करु नका असं सांगतात. पण यामागील कारण हे 99 टक्के लोकांना माहिती नसतं. आज आपण या नियमामागील शास्त्रीय आणि वैज्ञानिक कारणही जाणून घेणार आहोत. (Shouldnt you take a bath while naked According to Shastras and scientific reason in marathi)
श्रीमद भागवत पुराणातील दहाव्या स्कंधात आणि बाविसाव्या अध्यायात कथा सांगण्यात आलं की, कृष्णासारखा पती आपल्याला मिळावा म्हणून गोपिकांनी कात्यायनी देवीचे व्रत केलंय. हे व्रत करताना गोपिका यमुना नदीत व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन स्नान करत असताना श्रीकृष्ण म्हणाले की,
यूयं विवस्त्रा यदपो धृतव्रता, व्यगाहतैतत तदु देवहेलनम
बद्धवांजली मुर्धन्यपनुत्तयेsहस: कृत्त्वा नमोsधो वसनं प्रगृह्यताम !!
या श्लोकाचा अर्थ असा होतो की, मुलींनो, तुम्ही व्रतस्थ अवस्थेत विवस्त्र होऊन या पाण्यामध्ये स्नान केलेत. त्यामुळे जलदेवता वरुण आणि यमुना नदी यांची अवहेलना झालीय. म्हणून या दोघांचे निवारण करण्यासाठी तुम्ही आपले हात मस्तकावर जोडून त्यांना नमस्कार करा आणि नंतर आपापली वस्त्रे घ्या.
साधा शब्दात सांगायच म्हणजे विवस्त्र होऊ आंघोळ केल्यास जलदेवता आणि वरुण देवता यांची अवहेलना होते. त्यामुळे जलदेवता आणि वरुण देवता यांचा अनादर, अपमान होऊ नये म्हणून विवस्त्र होऊ कधीही आंघोळ करु नये.
पूर्वीच्या काळात एकत्र कुटुंब पद्धती असायची. अशावेळी आंघोळीसाठी बाथरुम हे वेगवेगळे नसायचे आणि जुन्या काळात त्याला न्हाणीघर म्हटलं जायचं. अनेक घरात त्याला दार नसायचं. परदा लावलेला असायचा. तर काही जुन्या न्हाणीघराला दार असलं तरी त्याला नीट कडी लागायची नाही. त्यामुळे पटकन कोणी आलं, अशावेळी आपल्या अंगावर कपडे नसेल तर आपलं रक्षण होत नाही. हे टाळण्यासाठी आंघोळ करताना एकतरी कपडा अंगावर असावा हा नियम सांगण्यात आला असावा.
नेहा चौधरी या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर (वरिष्ठ उपसंपादक) पदावर कार्यरत आहे. त्यांना पत्रकारिता क्षेत्रातील 20 वर्षांचा अनुभव आहे. इलेक्ट्रॉनिक आणि ऑनलाइन मीडियामध्ये प्रदीर्घ अनुभव आहे. त्यांनी पत्रकाराची सुरुवात रिपोर्टर म्हणून देशोन्नती वृत्तपत्रातून केली. राजकारणापासून मनोरंजनापर्यंत बातम्यांचा आढावा त्यांनी घेतला. 2006 मधील मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट हल्ला, 26/11 मुंबई हल्ला, प्रमोद महाजन हत्या अशा अनेक घटनांचे कव्हरेज त्यांनी केलं आहे. त्यानंतर ई टीव्ही मराठीमध्येही रिपोर्टर म्हणून काम केलं. त्यानंतर मी मराठी, साम मराठी, जय महाराष्ट्र, न्यूज 18 लोकमतमध्ये अनेक वर्ष त्यांनी आऊटपूटमध्ये रनडाउन प्रोड्यूसर म्हणून काम केलं. आता त्या 'झी 24 तास डिजीटल'मध्ये कार्यरत आहेत. इथे त्या राजकारण, गुन्हेगारीपासून मनोरंजनापर्यंत ग्रामीण भागातील बातम्यांमध्ये आपलं योगदान देतात. त्यासोबत सोशल मीडियावरील व्हायरल आणि ट्रेंडिंगवरही त्या लिखाण करतात. तर आरोग्य, लाइफस्टाइल या बातम्यांमध्ये विशेष रुची आहे. तर गेल्या 2 वर्षांपासून त्यांनी ज्योतिष आणि धर्म यावर काम करत आहेत. त्यांनी हस्तरेषाशास्त्र, वास्तु आणि फेंगशुईसह वैदिक ज्योतिष, अंकशास्त्र आणि टॅरोचाही पुस्तकाच वाचन आणि तज्ज्ञांनी बोलून लोकांना माहितीपूर्ण बातम्या देतात. सण, उत्सवाचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व याची त्या त्यांचा बातम्यांमधून समतोल राखतात. त्यांच्या मोकळ्या वेळेत त्यांना धार्मिक ग्रंथांच वाचन तसंच प्रवास, संगीताची आवड आहे.
...Read More|
NZ
|
VS |
IND
|
| India beat New Zealand by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| Australia beat England by 5 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
ENG
|
VS |
AUS
|
| England beat Australia by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.