Mahakumbh : नागा साधुंसाठी का महत्त्वाचा असतो कुंभमेळा? कारण अतिशय महत्त्वाचं

प्रयागराजमधील गंगा नदीच्या संगमाच्या काठावर 12 वर्षांनी महाकुंभ होत आहे. अशा परिस्थितीत अमृत स्नानासाठी संत-ऋषींचा मेळावा होत आहे. आता प्रश्न असा उद्भवतो की महाकुंभ हे ऋषी-मुनींसाठी इतके महत्त्वाचे का आहे?

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Jan 21, 2025, 02:48 PM IST
Mahakumbh : नागा साधुंसाठी का महत्त्वाचा असतो कुंभमेळा? कारण अतिशय महत्त्वाचं

महाकुंभाचे दुसरे अमृत स्नान 29 जानेवारी रोजी सुरु झाला आहे. तसेच महाकुंभ २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. संगमच्या काठावर, नागा साधूंच्या 13 आखाड्यांनी आपले तळ उभारले असून ते परमेश्वराच्या भक्तीत मग्न आहेत. अमृत ​​स्नानाच्या दिवशी हे नागा साधू सर्वात आधी स्नान करतात. हिंदू धर्मात महाकुंभाचे एक वेगळे महत्त्व आहे. कारण ते 12 वर्षांनी येते. शिवाय, महाकुंभ देशात फक्त 4 ठिकाणी आयोजित केला जातो ज्यामध्ये उज्जैन, हरिद्वार, नाशिक आणि प्रयागराज यांचा समावेश आहे.

Add Zee News as a Preferred Source

नागा साधूंचे पहिले स्नान हे धर्म आणि आध्यात्मिक उर्जेचे केंद्र मानले जाते. अमृत ​​स्नानात, सर्वप्रथम 13 आखाड्यांमधील नाग, संत, आचार्य, महामंडलेश्वर, महिला नागा साधू स्नान करतात. यानंतर भक्तांची पाळी येते. कुंभमेळ्याच्या परंपरेनुसार, अमृत स्नान फक्त विशिष्ट तारखांनाच होते. देशभरातील साधू आणि संत या महाकुंभात येतात आणि पवित्र नदीत स्नान करतात. धार्मिक श्रद्धेनुसार, महाकुंभात अमृत स्नान केल्याने मोक्ष मिळतो आणि शरीर आणि मनातील अशुद्धता दूर होतात.

साधू आणि संन्यासींसाठी महाकुंभ का आवश्यक?

शास्त्रांनुसार, महाकुंभ हे ऋषी आणि भिक्षूंसाठी खूप महत्वाचे स्नान मानले जाते. असे मानले जाते की, फक्त अमृत स्नान केल्याने 1000 अश्वमेध यज्ञांचे पुण्य मिळते. महाकुंभात अमृत स्नान केल्यानंतर, ऋषी आणि संत प्रभूचे ध्यान करतात. हेच कारण आहे की, संत आणि ऋषी निश्चितच विश्व कल्याणासाठी आणि स्वतःच्या मुक्तीसाठी महाकुंभात जातात.

अमृत ​​स्नान कधी आहे?

महाकुंभातील पहिले अमृत स्नान 14 जानेवारी रोजी पूर्ण झाले आहे, आता दुसऱ्या अमृत स्नानाची पाळी आहे जी 29 जानेवारी रोजी होणार आहे. यानंतर, तिसरे अमृत स्नान 3 फेब्रुवारी रोजी होईल. यानंतर, माघी पौर्णिमेला स्नान 12 फेब्रुवारी आणि महाशिवरात्रीला २६ फेब्रुवारी होईल.

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

About the Author

Dakshata Thasale

दक्षता ठसाळे-घोसाळकर या 'झी 24 तास डिजिटल'मध्ये चीफ सब एडिटर म्हणून कार्यरत आहे. यांना पत्रकारिता या क्षेत्रातील 14 वर्षांचा अनुभव आहे. 'प्रहार' आणि 'लोकमत' या आघाडीच्या वृत्तसंस्था आणि 'टीव्ही 9' आणि 'न्यूज एक्सप्रेस मराठी' या आघाडीच्या वृत्तवाहिनीचा अनुभव घेतल्यानंतर डिजीटल क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. 'India.com मराठी' या डिजीटल वेबसाईटमध्ये काम केल्यानंतर 'महाराष्ट्र टाईम्स' च्या ऑनलाईन वेबसाईटसाठी काम केलं. यानंतर 'झी 24 तास डिजीटल'मध्ये विविध विषयांवरील बातम्यांमध्ये योगदान दिलं आहे. यामध्ये Lifestyle, आरोग्य, मनोरंजन यामधील बातम्यांमध्ये हातखंडा असून राज्यस्तरीय घडामोडी, गुन्हे आणि राजकीय घडामोडींमध्ये सर्वात मोठं योगदान आहे. पालकत्व, गर्भधारणा आणि पाककृती यासंदर्भात लेख लिहण्यास विशेष रुची आहे. 

...Read More