‘भारतीय खेळाडू घाबरतात...’, अजिंक्य रहाणेचा BCCI सिलेक्टर्सवर थेट निशाणा! निवड प्रक्रियेवर केले गंभीर प्रश्न

Ajinkya Rahane on BCCI: भारतीय संघाचा ज्येष्ठ फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणे यांनी संघ निवडीबाबत एक महत्त्वपूर्ण विधान केले आहे.   

तेजश्री गायकवाड | Updated: Oct 15, 2025, 11:45 AM IST
‘भारतीय खेळाडू घाबरतात...’, अजिंक्य रहाणेचा BCCI सिलेक्टर्सवर थेट निशाणा! निवड प्रक्रियेवर केले गंभीर प्रश्न

Ajinkya Rahane on selectors: टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार अजिंक्य रहाणेने निवड प्रक्रियेवर मोठं वक्तव्य केलं आहे. रहाणेच्या म्हणण्यानुसार, भारतात खेळाडूंच्या सिलेक्शन सिस्टीममध्ये मोठ्या सुधारांची गरज आहे. त्याचं मत आहे की, भारतीय खेळाडू सिलेक्टर्सच्या भीतीमुळे मोकळेपणाने खेळू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा टॅलेंट दडपला जातो.

Add Zee News as a Preferred Source

काय म्हणाला राहणे? 

रहाणेने भारतीय क्रिकेटमधील सिलेक्शन सिस्टीमवर मोठी चर्चा सुरू केली आहे. त्याचे मत आहे की सिलेक्टर्सची नियुक्ती करण्याची पद्धतच बदलण्याची वेळ आली आहे, विशेषत: डोमेस्टिक क्रिकेटच्या स्तरावर. रहाणे म्हणाला की, टीम निवडण्याची जबाबदारी अशा माजी फर्स्ट क्लास क्रिकेटर्सकडे असावी, ज्यांनी नुकतेच क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, कारण ते आधुनिक क्रिकेटच्या मागण्या आणि खेळाडूंच्या क्षमतांना चांगल्या प्रकारे समजू शकतात.

हे ही वाचा: Babar Azam Birthday Special: किती संपत्तीचा मालक आहे पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझम? जाणून घ्या Net Worth

 

महत्त्वाचं म्हणजे अजिंक्य रहाणेने अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अधिकृतपणे निवृत्ती घेतलेली नाही, पण त्याने या वर्षाच्या सुरुवातीला मुंबई संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. त्याच्या या वक्तव्यामुळे असा संकेत मिळतो की अनेक खेळाडू सध्याच्या सिलेक्टर्सच्या भीतीमुळे खुलं प्रदर्शन करू शकत नाहीत आणि त्यामुळे सिस्टममध्ये बदल अत्यावश्यक आहे. रहाणेचं हे वक्तव्य बीसीसीआयच्या सिलेक्टर्सवर थेट निशाणा मानलं जातंय, कारण ते स्वतः बराच काळ टीम इंडियातून बाहेर आहेत.

सिलेक्टर्स कसे असावे?

रहाणेने त्यांच्या माजी सहकारी चेतेश्वर पुजारासोबत त्यांच्या YouTube चॅनेलवर बोलताना सांगितलं की, “खेळाडूंनी सिलेक्टर्सला घाबरता कामा नये. मी विशेषतः डोमेस्टिक क्रिकेटच्या सिलेक्टर्सबद्दल बोलतो आहे. आपल्याकडे असे सिलेक्टर्स असले पाहिजेत जे नुकतेच टॉप-लेव्हल क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत, जास्तीत जास्त पाच-सहा किंवा सात-आठ वर्षांपूर्वी रिटायर झाले असतील.”

हे ही वाचा: Mahieka Sharma: हार्दिक पांड्याची नवी गर्लफ्रेंड माहिका शर्माकडे ‘Good News’! पोस्ट चर्चेत

 

त्याने पुढे म्हटलं की, “क्रिकेट सतत बदलत आहे आणि त्यामुळे सिलेक्टर्सची मानसिकता आणि विचारसरणीही बदलत्या काळानुसार असणे गरजेचे आहे. निर्णय घेण्याची पद्धत 20-30 वर्षांपूर्वीच्या क्रिकेटवर आधारित असू नये. टी20 आणि आयपीएलसारख्या फॉरमॅट्समध्ये आधुनिक क्रिकेटर्सचा खेळाचा दृष्टिकोन समजून घेणं खूप गरजेचं आहे.”

निवड प्रक्रियेवर निशाणा 

रहाणेने निवड प्रक्रियेवर निशाणा साधत सांगितलं की, सध्याच्या नियमानुसार जे खेळाडू 10 फर्स्ट-क्लास सामने खेळले आहेत आणि ज्यांना रिटायरमेंटला किमान पाच वर्षे झाली आहेत, ते डोमेस्टिक स्तरावर सिलेक्टर होण्यासाठी अर्ज करू शकतात. मात्र, रहाणेच्या मते ही प्रणाली आता कालबाह्य झाली आहे. त्याने सुचवलं की टीम निवडीची जबाबदारी अशा माजी खेळाडूंना द्यायला हवी, ज्यांनी अलीकडेच क्रिकेट सोडलं आहे.

चेतेश्वर पुजाराचं समर्थन 

चेतेश्वर पुजाराने रहाणेच्या मताशी आंशिक सहमती दर्शवली. पुजारा म्हणाला की, “मोठ्या राज्यांमध्ये हे मॉडेल लागू करता येईल, कारण तिथे अनेक पर्याय असतात. पण याचा अर्थ असा नाही की जुन्या काळात खेळलेले आणि चांगला विक्रम असलेले क्रिकेटर्स सिलेक्टर होऊ नयेत.”

हे ही वाचा: अखेरीस रोहित-कोहलीवर आली अखेर गंभीरची प्रतिक्रिया, म्हणाला, " वर्ल्ड कप अजून..."

 

FAQ

1. अजिंक्य रहाणेने BCCI सिलेक्टर्सबद्दल काय म्हटलं?
अजिंक्य रहाणेने सांगितलं की भारताच्या टीम सिलेक्शन सिस्टिममध्ये मोठ्या बदलांची गरज आहे. त्याच्या मते, अनेक भारतीय खेळाडू सिलेक्टर्सच्या भीतीमुळे मुक्तपणे खेळू शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांचा टॅलेंट दडपला जातो.

2. रहाणेने सिलेक्टर्सवर टीका का केली?
रहाणेने अप्रत्यक्षपणे सध्याच्या BCCI सिलेक्टर्सवर निशाणा साधला. त्याने सांगितलं की फक्त अलीकडे रिटायर झालेले फर्स्ट क्लास क्रिकेटर्सच सिलेक्टर बनायला हवेत, कारण ते आधुनिक क्रिकेट अधिक चांगल्या प्रकारे समजतात.

3. सध्या अजिंक्य रहाणेची स्थिती काय आहे?
अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अधिकृत निवृत्ती घेतलेली नाही, पण या वर्षीच्या सुरुवातीला त्याने मुंबईच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. तो बराच काळ टीम इंडियाच्या स्क्वॉडपासून बाहेर आहे.

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More