'रोहित शर्मा काही मदत करत नाहीये, त्याला...,' मुंबई इंडियन्सला माजी कर्णधाराचा सल्ला, 'वर्ल्डकप असता तर...'

जर रोहित शर्मा (Rohit Sharma) आघाडीला फलंदाजी करत धावा करण्यात असमर्थ ठरत असेल तर त्याचा फलंदाजी क्रमांक बदलू शकतो असा सल्ला अंजूमने (Anjum) दिला आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 15, 2025, 06:41 PM IST
'रोहित शर्मा काही मदत करत नाहीये, त्याला...,' मुंबई इंडियन्सला माजी कर्णधाराचा सल्ला, 'वर्ल्डकप असता तर...'

आयपीएलमध्ये रोहित शर्मा अद्यापही अपेक्षित कामगिरी करु शकलेला नाही. याचा परिणाम मुंबई इंडियन्स संघाच्या कामगिरीवर होत असल्याचं महिला भारतीय संघाची कर्णधार अंजुम चोप्राने म्हटलं आहे. हार्दिक पांड्याचा नेतृत्वातील संघात रोहित शर्माने आतापर्यंत 0,8, 13, 17, आणि 18 धावा केल्या आहेत. नुकत्याच झालेल्या दिल्लीविरोधातील सामन्यात मुंबई इंडियन्सने विजयाची नोंद केली. त्यानंतर चार पराभव आणि दोन विजयांसह मुंबई इंडियन्स संघ सहाव्या स्थानावर आहे. 

"तुम्ही फॉर्ममध्ये नसू शकता. फॉर्ममध्ये नसणं हा काही गुन्हा नाही. फक्त हे मदतशीर ठरत नाही आहे. मुंबई इंडियन्सला यामुळे अपेक्षित सुरुवात मिळत नाही आहे," असं अंजूमने पीटीआयशी संवाद साधताना म्हटलं. अंजुमने सुचवलं की, "जर रोहित आघाडीला खेळून अपेक्षित कामगिरी करत नसेल त्याला खालच्या क्रमांकावर खेळणं योग्य ठरु शकतं".

"म्हणजे, मला असं म्हणायचं आहे की, त्यांच्याकडे पर्याय आहेत. ते रोहित शर्माला क्रमवारीत ढकलणं किंवा इतर सर्व पर्याय वापरत नाहीत हे पाहू शकता. परंतु असं नाही की रोहित शर्मा फॉर्ममध्ये नाही, इतकेच आहे की काहीवेळा तुम्ही त्या चांगल्या शिखरावर स्पर्धा सुरू करत नाही आणि त्याचा एक फलंदाज किंवा खेळाडू म्हणून तुमच्यावर परिणाम होऊ शकतो," असं मत अंजूमने मांडलं आहे. 

"म्हणून, हे पार्ट आणि पार्सल आहे. आपण एखादी स्पर्धा आयपीएल किंवा विश्वचषक म्हणून पाहत आहोत. तुमचा सर्वोत्तम फलंदाज विश्वचषकात फॉर्मात असावा असं वाटतं की नाही? आणि अशा प्रकारची कामगिरी करण्यात खूप ऊर्जा खर्च होते," असं तिने सांगितलं. 

"काही लोक त्यातून सावरतात आणि इतरांपेक्षा लवकर पुढच्या स्पर्धेत प्रवेश करतात. असं नाही की इतरांना त्यात प्रवेश मिळू शकत नाही. त्याला अपेक्षित सुरुवात मिळाली नाही, पण तो कोणत्या प्रकारचा खेळाडू आहे किंवा कोणत्या प्रकारचा सामना विजेता आहे हे आपल्याला माहिती आहे," असं अंजुम म्हणाली.