विराटच्या टीकेनंतर 'फॅमिली रुल्स'बद्दल आले मोठे अपडेट, BCCI ने टीम इंडियाला दिला धक्का!

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने  टीम इंडियाच्या खेळाडूंना फॅमिली नियमांवरून मोठा झटका दिला आहे. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंना टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर बोर्डाने खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या परदेशी दौऱ्यांवर राहण्याबाबत काही नियम केले होते.  

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 20, 2025, 08:35 AM IST
विराटच्या टीकेनंतर 'फॅमिली रुल्स'बद्दल आले मोठे अपडेट,  BCCI ने  टीम इंडियाला दिला धक्का!
Virat Kolhi on Family Rule

Indian Cricket Team: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका गमावल्यानंतर भारतीय खेळाडूंना टीकेला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर बोर्डाने खेळाडू आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या परदेशी दौऱ्यांवर राहण्याबाबत काही नियम केले होते. त्यानुसार पूर्ण वेळ कुटुंब खेळाडू सोबत एकत्र राहू शकणार न्हवते. या नियमावर  विराट कोहली याला फारसा आनंद झाला नाही. या नियमावर  त्याने टीका केली होती आणि त्यानंतर बोर्डाने नियमात काही बदल केल्याचे अहवाल समोर आले. मात्र, नक्की काय झालं याबद्दल जाऊन घेऊयात...

Add Zee News as a Preferred Source

नियमांमध्ये बदल होणार? 

 बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये असे नमूद केले आहे की, खेळाडूंचे कुटुंब एका कालावधीनंतर परदेशी दौऱ्यांमध्ये संघासोबत राहू शकणार नाहीत. मात्र, विराट कोहलीच्या टीकेनंतर बीसीसीआय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये बदल करण्याचा विचार करत असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. आता सैकियाने यावर एक मोठे अपडेट दिले आहे.  "सध्याचा नियम  या टप्प्यावर कायम राहील कारण ते राष्ट्र आणि आमची संघटना, बीसीसीआय या दोघांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे," असे त्यांनी  क्रिकबझला सांगितले.

हे ही वाचा: 434,742,00,000 रुपयांची गुंतवणूक अन् IPL ला टक्कर, BCCI सोबत पंगा घेत 'हा' देश घेऊन येतोय मोठी लीग

 

नक्की काय म्हणाले सैकया? 

सैकिया म्हणाले, "बीसीसीआय ओळखते की काही नाराजी किंवा भिन्न मते असू शकतात, कारण लोकशाही सेटअपमध्ये लोकांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. हे नियम सर्व संघ सदस्यांना - खेळाडू, प्रशिक्षक, व्यवस्थापक, सपोर्ट स्टाफ आणि सहभागी असलेल्या प्रत्येकासाठी समान रीतीने लागू होते. आणि प्रत्येकाचे सर्वोत्तम हित लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी केली जाते. हे नियम  एका रात्रीत बनवलेले नाही." 

हे ही वाचा: "माझ्या आवडत्या छोले भटुरेबद्दल बोलण्यापेक्षा..." विराट कोहलीने ब्रॉडकास्टर्सवर केली जाहीर टीका

 

नियमांमध्ये काय विशेष आहे?

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, हा दौरा ४५ दिवसांपेक्षा जास्त काळ चालल्यास खेळाडूंचे कुटुंबीय परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघासोबत दोन आठवड्यांपर्यंत प्रवास करू शकतात."बीसीसीआयने परदेशी दौऱ्यांदरम्यान खेळाडूंसोबत असलेल्या कुटुंबातील सदस्यांच्या मुक्कामाचा कालावधी वाढवला आहे, विशेष परिस्थितीत नियम शिथिल करण्याच्या तरतुदीसह, परंतु हे योग्य प्रक्रियेद्वारे केले जाईल." असे सैकिया म्हणाले.

 

About the Author

Tejashree Gaikwad

तेजश्री गायकवाड- कदम 'झी 24 तास डिजीटल'मध्ये सिनियर सब एडिटर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना मीडिया क्षेत्राचा 9 वर्षांचा अनुभव आहे. लोकसत्तामधून त्यांनी कारकिर्दीची सुरुवात केली. लोकसत्ताच्या Viva पुरवणीमधून 7 वर्ष विविध विषयांवर लिखाण केले आहे. दैनिक भास्करच्या 'मधुरिमा' मधून फॅशन विषयांवर लिखाण केले आहे.  'झी 24 तास'च्या आधी त्यांनी नवशक्ती (फ्री प्रेस जर्नल), हिंदुस्थान टाइम्स मराठी डिजिटल, लोकसत्ता ऑनलाईन या वृत्तसंस्थेत लिखित बातम्या आणि व्हिडीओ अशा दोन्ही फॉरमॅटमध्ये काम केले आहे. 2018 ते 2023 पर्यंत मुंबई आकाशवाणीमध्ये व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट आणि कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. फॅशन, लाइफस्टाईल, मनोरंजन आणि स्पोर्ट्स या विविध विषयांमध्ये रुची आहे. 

...Read More