)
Ind vs Aus Mohammed Shami Slams Ajit Agarkar: भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यासाठी बुधवारी रवाना झाला. या मालिकेसाठी 35 वर्षीय मोहम्मद शमीला वगळम्यात आलं आहे. खरं तर शमी गेल्या काही काळापासून भारतीय कसोटी संघात नाही. जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) च्या अंतिम सामना खेळला होता. मात्र ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतूनही शमीला वगण्यात आल्याने तो नाराज झाला आहे. त्याने थेट निवड समितीचे प्रमुख अजित आगरकरांवर निशाणा साधला आहे.
संघात निवड न झाल्यासंदर्भात विचारण्यात आलं असता शमीने, "मी हे या आधीही सांगितले आहे... निवड माझ्या हातात नाही. जर फिटनेसचा प्रश्न असेल तर मी बंगालकडूनही खेळता कामा नये," असे कोलकात्यामधील ईडन गार्डन्सवर उत्तराखंडविरुद्ध बंगालच्या रणजी ट्रफी स्पर्धेतील सलामीच्या सामन्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना म्हटं. "मला वाटते की मला यावर बोलण्याची आणि वाद निर्माण करण्याची गरज नाही. जर मी चार दिवसांचे (रणजी ट्रॉफी) सामने खेळू शकलो तर मी 50 षटकांचे क्रिकेट देखील खेळू शकतो," असंही शमी म्हणाला. 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी भारताच्या मर्यादित षटकांच्या संघातून त्याला वगळल्याबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर शमी हे म्हणाला.
निवड समितीचे प्रमुख अजित आगरकरांनी केलेल्या विधानावरुन शमीला प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शमीने निवडकर्त्यांना माझ्या फिटनेसबद्दल अपडेट देणे हे माझे काम नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर केल्यानंतर निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांना शमीला का वगळण्यात आलं असं विचारलं असता त्यांनी सांगितले होते की, शमीच्या फिटनेसबद्दल आमच्याकडे कोणतेही अपडेट नाही, असं म्हटलं होतं. हाच संदर्भ देत शमीला प्रश्न विचारण्यात आला असता त्याने, "अपडेट देण्याबद्दलचं काम, अपडेट देणे किंवा अपडेट मागणे ही माझी जबाबदारी नाही. माझ्या फिटनेसबद्दल अपडेट देणे हे माझे काम नाही. माझे काम एनसीए (सेंटर ऑफ एक्सलन्स) मध्ये जाणे, तयारी करणे आणि सामने खेळणे आहे. वो उनकी बात है उनको कौन अपडेट डेटा है, किसने नहीं दिया (त्यांना अपडेट्स कोण देते किंवा नाही हा त्यांचा प्रश्न आहे). ते माझी जबाबदारी नाही," असे उत्तर दिले. 'सीओई'ने फिटनेस प्रमाणपत्रे जारी करणे आवश्यक असलेल्या नियमांनुसार आवश्यक असल्याचं शमी अगदी स्पष्टपणे म्हणाला. या विधानावरुन शमी अगरकरवर संतापल्याचं दिसून आलं.
शमी हा भारतीय संघातील सध्याच्या सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने 2023 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये उपविजेत्या भारतीय संघाकडून खेळाना सात सामन्यांमध्ये 24 विकेट्स घेतल्या होत्या. वारंवार होणाऱ्या गुडघ्याच्या दुखण्यामुळे शमीला ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी दुर्लक्षित करण्यात आले होते, परंतु या वर्षी मार्चमध्ये भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत शमीने उत्कृष्ट कामगिरी केली होती.
भारतीय संघ मोठ्या बदलांना समोरे जात असताना, शमी आशावादी आहे की त्याला संधी मिळेल. मात्र त्याचवेळी तो व्यावहारिक विचार करतोय. "मी नेहमीच म्हणतो की तुम्ही तुमच्या देशासाठी सर्वोत्तम खेळाडू निवडले पाहिजे. हा देशाचा प्रश्न आहे. देश जिंकला पाहिजे. आपण सर्वांनी आनंदी असले पाहिजे. मी नेहमीच हे म्हणतो," असं शमी म्हणाला. "लढत राहा, खेळत राहा. जर तुम्ही चांगले प्रदर्शन केले तर त्याचा तुम्हालाही फायदा होईल. निवड माझ्या हातात नाही. मी फक्त तयारी करू शकतो आणि सामने खेळू शकतो. मला काही हरकत नाही... जर तुम्ही मला निवडले नाही, तर मी येथे येऊन बंगालसाठी खेळेन. मला त्यात काही अडचण नाही," असं शमी पुढे म्हणाला.
क्रिकेटसारख्या खेळात खेळाडू नेहमीच सातत्यपूर्ण राहू शकत नाही असं शमी म्हणाला. "मलाही वेदनेसहीत खेळायचे नाही किंवा संघाला त्रास द्यायचा नाही. शस्त्रक्रियेनंतर मला परत यायचे होते आणि मजबूत पुनरागमन करायचे होते. मीही तेच करण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा जेव्हा निवडकर्त्यांनी मला मैदानावर जायला सांगितले तेव्हा मी मैदानावर जाण्यास तयार आहे," असे 64 कसोटी, 108 एकदिवसीय आणि 25 टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा अनुभवी वेगवान गोलंदाज म्हणाला.
शमीने तो अजूनही देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व देतो असं सांगितलं. "जुन्या काळात रणजी ट्रॉफी ही कोणासाठीही मोठी स्पर्धा होती. पण आज आपल्याकडे या माध्यमातून एक व्यासपीठ आहे. अनेकांना असे वाटते की रणजी ट्रॉफीसारखे ज्युनियर क्रिकेट खेळण्यासाठी परत जाणे 'अपमान' आहे. मला तसे वाटत नाही. तुम्ही चार दिवसांचे क्रिकेट खेळले पाहिजे," असं शमी म्हणाला. "जर अशी परिस्थिती असेल की तुम्ही रणजी ट्रॉफीमध्ये कामगिरी केली तर तुम्ही संघात असाल, तर त्यात काहीही चुकीचे नाही. निःसंशयपणे, तुम्ही कामगिरी केली पाहिजे आणि त्याच जीवावर तुमची निवड होईल," असं शमी पुढे म्हणाला.