)
IND vs AUS T20 match in Canberra stop due to rain: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला टी20 सामना कॅनबेरात पावसाच्या अडथळ्यामुळे अखेर रद्द करण्यात आला. सामन्यादरम्यान दोन वेळा पावसाने खेळ थांबवला आणि दुसऱ्यांदा तर पाऊस इतका जोरात पडू लागला की मैदान पुन्हा खेळण्यासाठी तयारच होऊ शकले नाही. पहिल्यांदा फलंदाजी करताना टीम इंडियाने जोरदार सुरुवात केली होती. ओपनर अभिषेक शर्मा 19 धावा करून बाद झाले, पण कप्तान सूर्यकुमार यादव आणि उपकप्तान शुभमन गिल यांनी जबरदस्त बॅटिंग करत भारतीय चाहत्यांना खुश केलं.
शुभमन गिलने फक्त 20 चेंडूत 37 धावा ठोकल्या, त्याचा स्ट्राइक रेट होता तब्बल 185. तर सूर्यकुमार यादवने 24 चेंडूत 39 धावा केल्या, त्यात 2 षटकार आणि 3 चौकार होते. अलीकडच्या काही सामन्यांत या दोघांची फॉर्म चिंतेचा विषय बनली होती, पण कॅनबेरात त्यांनी शानदार फलंदाजी करून टीम मॅनेजमेंटची आणि फॅन्सची चिंता काही अंशी कमी केली.
पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर आता भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी20 सामना 31 ऑक्टोबर रोजी मेलबर्न येथे खेळवला जाणार आहे. मात्र मेलबर्नमध्येही हवामान अंदाज काहीसा चिंताजनक आहे. तिथे पावसाची सुमारे 50 टक्के शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांना पुन्हा एकदा हवामानावर अवलंबून रहावं लागू शकतं.
कॅनबेरातील 9.4 षटकांच्या खेळातच ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची वाट लागेल दिसून आली. हेजलवुड, बार्टलेट, नॅथन एलिस आणि कुहनेमन यांसारख्या अनुभवी गोलंदाजांना भारतीय फलंदाजांसमोर कस लागत होता. केवळ 9.4 षटकांत भारताने तब्बल 97 धावा फटकावल्या. मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलियन टीमला वेगळी रणनीती आखावी लागेल, नाहीतर पुन्हा एकदा भारतीय फलंदाज त्यांच्यावर तुटून पडू शकतात.
सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, नीतीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (विकेटकीपर), रिंकू सिंह, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन (विकेटकीपर), वरुण चक्रवर्ती.