मुंबई : नेहमी कांगावा करणा-या पाकिस्तानने नागरी विमानांचा ढालीसारखा वापर केल्याचं समोर आलं आहे. भारतावर हल्ला करताना लाहोरच्या आकाशात नागरी विमानं उडत होती अशी माहिती भारताने दिली आहे. भारताने पाकच्या या कारनाम्यांचा पर्दाफाश केला आहे.
पाकिस्तान हा जबाबदार देश नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. पाकिस्ताननं गुरुवारी संध्याकाळी जम्मू, पठाणकोट, जैसलमेरपर्यंत ड्रोन आणि मिसाईल हल्ले केले. हे हल्ले करताना पाकिस्ताननं नागरी विमानं आणि त्या विमानांमधून प्रवास करणा-या प्रवाशांचा अक्षरक्षः ढालीसारखा वापर केला. जेव्हा ड्रोनचा हल्ला झाला त्यावेळी लाहोरच्या आकाशात नागरी विमानं उडत होती असा आरोप होऊ लागलाय. पाकिस्ताननं भारतावर हल्ला करताना नागरी विमानांचा ढालीसारखा वापर केल्याचा आरोप भारतानं केला आहे.
भारताच्या प्रतिहल्ल्यात नागरी विमान लक्ष्य होण्यासारखी कोणतीही अप्रिय घटना घडली असती तर पाकिस्ताननं कांगावा केला असता. पण भारतानं संयम राखत प्रतिहल्ला केला. गुरुवारी रात्री आठच्या वेळेला पाकिस्तानच्या हवाई हद्दीत कोणती विमानं होती याचा पुरावाही भारतानं दिलाय.
पाकिस्ताननं हे जाणूनबुजून केल्याची शक्यता जास्त आहे. नागरिकांचं संरक्षण करण्याऐवजी नागरिकांचा ढाल म्हणून वापर करणं ही पाकिस्तानची जुनी खोड आहे. पाकिस्तानची हवाई हद्द नागरी वाहतुकीसाठी धोकादायक पद्धतीनं खुली ठेवणा-या पाकिस्तावर आंतरराष्ट्रीय नागरी हवाई वाहतूक नियमन संस्थांकडून कारवाईची अपेक्षा व्यक्क केली जाते आहे.