इरफान पठाणचा IPL च्या कॉमेंट्री पॅनलमधून पत्ता कट, धक्कादायक कारण आले समोर

IPL 2025, Irfan Pathan: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण सध्या आयपीएल 2025 मध्ये कॉमेंट्री करताना दिसत नाही. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून इरफान पठाण आयपीएलमधील कॉमेंट्री पॅनलचा नियमित सदस्य होता, पण यावेळी तो दिसत नाहीये.   

तेजश्री गायकवाड | Updated: Mar 24, 2025, 03:06 PM IST
इरफान पठाणचा IPL च्या कॉमेंट्री पॅनलमधून पत्ता कट, धक्कादायक कारण आले समोर

Irfan Pathan's commentary role cut: टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यापासून कॉमेंट्री करायचे काम करतो. तो निवृत्ती नंतर कॉमेंट्री पॅनलचा नियमित सदस्य होता. परंतु यंदाच्या सिजनमध्ये चित्र बदललं आहे. सध्या आयपीएल 2025 मध्ये कॉमेंट्री करताना दिसत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अनेक भारतीय क्रिकेटपटूंच्या तक्रारींमुळे इरफान पठाणला आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनलमधून वगळण्यात आले आहे. इरफान पठाणला काढण्यामागचं खरं कारण काय? जाणून घेऊयात... 

इरफानला कॉमेंट्री पॅनलमधून का काढून टाकण्यात आले?

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, इरफान पठाणला आयपीएल 2025 च्या कॉमेंट्री पॅनेलमधून वगळण्यात आले आहे. याचे कारण असे की, इरफान पठाणवर लाइव्ह कॉमेंट्री दरम्यान आपला वैयक्तिक अजेंडा राबवल्याचा आरोप आहे. इरफान पठाण हा ऑन-एअर कॉमेंट्री करताना आणि त्याच्या सोशल मीडिया हँडलवर वैयक्तिक अजेंडाबद्दल बोलत असल्याबद्दल खूश नव्हते. बीसीसीआयच्या सूत्राचा हवाला देत अहवालात म्हटले आहे की, 'काही वर्षांपूर्वी इरफान पठाणचे काही खेळाडूंसोबत भांडण झाले होते. तेव्हापासून तो त्यांच्यावर आक्रमकपणे भाष्य करण्यापासून मागे हटला नाही.' इरफान पठाणवर सोशल मीडियावर त्या खेळाडूंना टार्गेट केल्याचा आरोप आहे. 

संजय मांजरेकर यांनाही बसला धक्का

इरफान पठाणने 22 मार्च रोजी स्वतःचे YouTube चॅनल 'सिधी बात विथ इरफान पठाण' लाँच केले आहे. यावर तो गेमचे सखोल विश्लेषण करणार आहे. पण , इरफान पठाण कॉमेंट्री पॅनेलतून काढून टाकण्यात आलेला पहिला हाय-प्रोफाइल खेळाडू नाही. 2020 मध्ये, भारताचे माजी फलंदाज संजय मांजरेकर यांनाही काढण्यात आले होते. त्यांनी 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान रवींद्र जडेजा यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टिप्पण्यांबद्दल BCCI ने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या भारताच्या एकदिवसीय मालिकेच्या कॉमेंट्री पॅनेलमधून वगळले होते.

इरफान पठाणची कारकीर्द

इरफान पठाणने 2004 साली भारतासाठी आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात केली होती. इरफान पठाण हा भारतातील एकमेव गोलंदाज आहे ज्याने पहिल्याच षटकातच हॅट्ट्रिक घेण्याचा पराक्रम केला आहे. इरफान पठाणने भारतीय संघासाठी 29 कसोटी सामने, 120 एकदिवसीय सामने आणि 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. इरफान पठाण 2007 टी-20 विश्वचषक विजेत्या टीम इंडियाचा सदस्य आहे.