MI vs LSG : मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यामध्ये सामना खेळवण्यात आला या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले आहेत. त्यानंतर आता मुंबई इंडियन्सच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंद झाला आहे.

मुंबई इंडियन्सच्या संघाचा सध्या खराब फार्म सुरु आहे, मागील काही सामन्यांमध्ये त्यांना सातत्याने पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे आयपीएल 2026 मधून ते जवळजवळ बाहेर झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघाला आतापर्यत या सिझनमध्ये फक्त दोन विजय हाती लागले आहेत. मुंबई इंडियन्सच्या संघात क्रिकेट विश्वातील दिग्गज गोलंदाज आणि फलंदाज असूनही संघाला सातत्याने पराभवाचा सामना करावा लागत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली 9 सामन्यांमध्ये 7 पराभव झाले आहेत, तर संघ सध्या नवव्या स्थानावर आहे त्याचबरोबर मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा आता जवळजवळ संपुष्टात आल्या आहेत. आता मुंबई इंडियन्सच्या संघाने त्याच्या नावावर अनोखा विक्रम केला आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाच्या सातत्याने खराब कामगिरीनंतर आता त्याच्या नावावर अनोखा विक्रम नावावर केला आहे. आज त्यांचा सामना लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध खेळवण्यात आला हा सामना गमावल्यास संघाच्या प्लेऑफच्या आशा संपवणार आहेत. आजच्या सामन्यामध्ये संघाने त्याच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले आहेत त्यानंतर हा रेकॅार्ड त्याच्या नावावर झाला आहे.
हे ही वाचा
मुंबईच्या संघाने आजच्या सामन्यामध्ये त्यांच्या प्लेइंग 11 मध्ये काही बदल केले आहेत यामध्ये त्यांनी हार्दिक पांड्याला बरे नसल्यामुळे तो खेळत नाही त्याच्या जागेवर सुर्यकुमार यादव मुंबईचे कर्णधारपद सांभाळत आहे. तर आजच्या सामन्यामधून ट्रेंट बोल्ट या प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळाले नाही त्यामुळे मग आजच्या सामन्यात त्याच्या जागेवर कॅार्बिन बॅाश याला संघामध्ये स्थान देण्यात आले आहे. या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने प्लेइंग 11 मध्ये सातत्याने बदल केले, अनेक युवा खेळाडूंना संघामध्ये खेळण्याची संधी दिली पण संघातील खेळाडूंच्या खराब फॅार्ममुळे अनेक बदल वारंवार करण्यात आले.
सिझन आता अर्धा झाला आहे आणि मुंबई इंडियन्सच्या संघाने आतापर्यत 24 खेळाडूंचा वापर केला आहे, याआधी असे मुंबई इंडियन्सच्या संघाने दोन वेळा केले आहे. 2008 च्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सने संघामध्ये वारंवार बदल केले होते तर त्यानंतर दुसऱ्यांदा 2012 मध्ये केले होते. या दोन्ही सिझनमध्ये संघाला विजेतेपद मिळवता आले नाही, या सिझनमध्ये देखील संघाची कामगिरी पाहता संघ प्लेऑफमध्ये जाणे जवळजवळ अशक्य झाले आहे.