)
IND VS AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात तीन सामन्यांची वनडे सिरीज खेळवली जात असून यासाठी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. तीन सामन्यांच्या सीरिजमधील शेवटचा सामना हा शनिवार 25 ऑक्टोबर रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्माने त्याच्या आंतरराष्ट्रीय करिअरमधील 50 वं शतक ठोकलं.
सिडनीमध्ये शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सामन्याला सुरुवात झाली. यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि 236 धावा केल्या. त्यामुळे टीम इंडियाला विजयासाठी 237 धावांचं आव्हान मिळालं. हे आव्हान पूर्ण करताना रोहित शर्माने शासकीय कामगिरी केली. रोहित शर्माने 105 बॉलमध्ये नाबाद 100 धावा पूर्ण केल्या आणि 11 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहित शर्माचं हे आंतरराष्ट्रीय करिअरमधील 50 वं शतक ठरलं. रोहितने आतापर्यंत वनडेत 33, टी 20 क्रिकेटमध्ये 5 तर टेस्ट क्रिकेटमध्ये 12 शतक पूर्ण केली आहेत.
ऑस्ट्रेलिया सीरिजपूर्वी रोहित शर्मा हा वनडे फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार होता. मात्र बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया सीरिजसाठी संघाची घोषणा केली तेव्हा रोहित शर्माकडून कर्णधारपद काढले आणि ते शुभमन गिलकडे सोपवले. टेस्ट आणि टी 20 फॉरमॅटमधून रोहित शर्माने यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे. मागील काही सामन्यांमध्ये त्याचा फॉर्म पाहता रोहित ऑस्ट्रेलिया सीरिजनंतर वनडे फॉरमॅटमधून सुद्धा निवृत्त होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. तसेच 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित केवळ 8 धावा करून बाद झाला, तेव्हा त्याला ट्रोल सुद्धा करण्यात आलं. मात्र दुसऱ्या सामन्यात 70 हुन अधिक धावा आणि तिसऱ्या सामन्यात थेट शतकीय कामगिरी केल्यामुळे रोहित शर्माने त्याच्या ट्रॉलर्सला अजून त्याच्यात खूप क्रिकेट शिल्लक आहे हे पुन्हा एकदा दर्शवले आहे.
सिडनी सामन्यात नेमकं काय घडलं?
उत्तर: २५ ऑक्टोबर २०२५ रोजी सिडनीमध्ये झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली आणि २३६ धावा केल्या. भारताला विजयासाठी २३७ धावांचं आव्हान मिळालं. रोहित शर्माने हे आव्हान पूर्ण करताना शतकीय खेळ केला. त्याने १०५ चेंडूंत नाबाद १०० धावा केल्या, ज्यात ११ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. हे त्याचं आंतरराष्ट्रीय करिअरमधील ५० वे शतक ठरलं.
रोहित शर्मा कॅप्टनसीबाबत काय घडलं?
उत्तर: ऑस्ट्रेलिया सिरीजपूर्वी रोहित शर्मा वनडे फॉरमॅटमधील भारतीय संघाचा कर्णधार होता. मात्र, बीसीसीआयने सिरीजसाठी संघ घोषित करताना त्याच्याकडून कर्णधारपद काढून घेतलं आणि ते शुभमन गिलकडे सोपवलं. यापूर्वी रोहितने टेस्ट आणि टी-२० फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती.
रोहित शर्माच्या शतकांची विभागणी कशी आहे?
उत्तर: रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ५० शतक केली आहेत. यापैकी वनडे फॉरमॅटमध्ये ३३, टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये ५ आणि टेस्ट क्रिकेटमध्ये १२ शतकं आहेत. ही कामगिरी त्याच्या दीर्घ आणि यशस्वी करिअरची साक्ष आहे.