पाणी

बाप्पा पावला, गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला पाणीकपात नाही

पाऊच चांगला न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईत पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, पालिकेने मुंबईकरांची दोन दिवस पाणीकपातीतून सुटका केली आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मुंबईत पाणीकपात होणार नाही.

Sep 17, 2015, 09:59 AM IST

'दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय?'

दुष्काळात जनता होरपळतेय आणि तुम्ही कुंभात शाही स्नान करताय? असा सनसणीत प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारवर ताशेरे ओढलेत. 

Sep 15, 2015, 06:42 PM IST

जयगडमधील जिंदाल प्रकल्पाचा फटका श्रद्धास्थानाला

रत्नागिरीजवळच्या जयगड येथील जिंदाल प्रकल्पाचा फटका आता क-हाटेश्वर इथल्या शेकडो वर्षांच्या श्रद्धास्थानालाही बसलाय. इथल्या गोमुखातून वाहणारं पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याचा अहवाल आल्यानं गावकरी संतप्त झालेत.

Sep 8, 2015, 04:53 PM IST

गोमुखातील पाणी पिण्यासाठी अयोग्य... जिंदालचा देवालाही त्रास

गोमुखातील पाणी पिण्यासाठी अयोग्य... जिंदालचा देवालाही त्रास

Sep 8, 2015, 01:35 PM IST

पाण्यावर १२५ मीटर धावण्याचा नवा विक्रम

शाओलीन माँकने पाण्यावर तरंगत ठेवलेल्या फूटबोर्डवर १२५ मीटर धावण्याचा नवा विक्रम केला आहे. 

हे फुटबोर्ड पाण्यावर असले, तरी साखळीप्रमाणे ते एकमेकांशी जोडलेले होते, त्यामुळे त्यावर चालणं तसं कठीण नव्हतं, या पूर्वी हा शाओलीन माँक या फुटबोर्डवरून पाण्यात अनेक वेळा कोसळला आहे.

पाण्यावर धावण्याचा हा १२५ मीटरचा नवा विक्रम आहे. २९ ऑगस्ट रोजी त्याने हा विक्रम केला.

Sep 6, 2015, 11:52 PM IST

पुण्यात आता दिवसाआड पाणीपुरवठा

पुण्यामध्ये अखेर पाणीबाणी घोषित झालीय. येत्या सोमवारपासून शहरात दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे. पुणेकरांना मिळणाऱ्या पाण्यात ३० टक्के कपातीचा निर्णय घेण्यात आलाय. पालकमंत्री गिरीश बापट यांनी महापालिकेत पाणी नियोजनाबाबत बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. 

Sep 4, 2015, 04:14 PM IST

पालकमंत्र्यांच्या वाढदिवसामुळे पुण्यातील पाणीकपात लांबणीवर

पुण्यात आज पंधरा टक्के पाणीकपातीची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या वाढदिवसामुळे पाणीकपातीची घोषणा उद्या होण्याची शक्यता आहे. पाणीकपात लागू झाल्यास पुणेकरांना दिवसातून एकदाच पाणी पुरवठा होईल.

Sep 3, 2015, 07:32 PM IST

सकाळ-सकाळ घ्या लिंबूयुक्त कोमट पाणी... आणि पाहा कमाल!

भरपूर प्रमाणात पाणी पिल्याचा आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगला फायदा होतो हे एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच.. पण, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायलं तर त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला मिळतो.

Aug 28, 2015, 12:31 PM IST