telangana

तेलंगण राज्याच्या निर्मितीला तीव्र विरोध, आंध्र बंद

वेगळ्या तेलंगण राज्याच्या निर्मितीला केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरूवारी हिरवा कंदील दाखविला खरा. मात्र, त्याचे पडसाद आंध्र प्रदेशात उमटले आहेत. आज आंध्र बंदची हाक देण्यात आली आहे. दरम्यान, केंद्रीय पर्यटन विकास मंत्री चिरंजीवी यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.

Oct 4, 2013, 10:19 AM IST

देशात फाटाफुटीचे लोण, आसामात हिंसाचार

आंध्र प्रदेशपासून तेलंगणा अलग करण्याचा निर्णय झाला खरा, पण देशात आता फाटाफुटीचे लोण पसरले आहे. महाराष्ट्र तोडण्याची भाषा केली गेलेय. वेगळा विदर्भानंतर मुंबईचे वेगळे राज्य. ईशान्य भारतात वेगळ्या बोडो राज्यासाठी हिंसाचार उफाळला. त्याचा फटका आसामसह पश्चिम बंगालला बसला आहे.

Aug 3, 2013, 10:05 AM IST

शोभा डेंचा मेंदू डोक्याच्या बाहेर- आव्हाड

शोभा डेंचा मेदू डोक्याचा बाहेर असल्याची खरमरीत टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

Jul 31, 2013, 07:29 PM IST

ही पेज थ्री पार्टीतली ओकारी - शिवसेना

महाराष्ट्रातून मुंबई वेगळी करण्याची भाषा म्हणजे `ही पेज थ्री पार्ट्यांमधली ओकारी आहे` अशा भाषेत शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शोभा डे यांना सुनावलंय.

Jul 31, 2013, 03:49 PM IST

शोभा डे, घटस्फोट घेण्याइतकं हे सोपं नाही - राज

मुंबईचं वेगळं राज्य का होऊ शकत नाही, असा प्रश्न विचारत लेखिका शोभा डे यांनी नवा वाद निर्माण केला आहे. यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जळळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. हे घटस्फोट घेण्याइतकं सोप आहे का?, असं राज म्हणालेत.

Jul 31, 2013, 03:24 PM IST

महाराष्ट्राचा नवा शेजारी... `तेलंगणा`!

स्वतंत्र तेलंगणासाठी सुरू असलेल्या साठ वर्षांच्या संघर्षाला पूर्णविराम मिळाला आहे. युपीए समन्वय समितीच्या बैठकीत स्वतंत्र तेलंगणाबाबत एकमतानं निर्णय घेण्यात आला.

Jul 30, 2013, 08:36 PM IST

स्वतंत्र तेलंगणाच्या औपचारिक घोषणेची शक्यता

स्वतंत्र तेलंगणाचा निर्णय आजच्या यूपीए समन्वय समितीच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे.

Jul 30, 2013, 10:51 AM IST

स्वतंत्र तेलंगणावरून रणकंदन

तेलंगाणाच्या मुद्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. टीआरएसच्या खासदारांनी स्वतंत्र तेलंगणाच्या मागणी करत गोंधळ घातला. यावेळी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी मात्र सत्ताधा-यांनाच लक्ष्य केलं. संसदेत विरोधकांची चर्चेची तयारी असते मात्र सत्ताधारी खासदारच सर्वाधिक गोंधळ घालतात आणि चर्चा होऊ देत नाहीत असा आरोप विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सत्ताधा-यांवर केला. दरम्यान, स्वतंत्र तेलंगणाच्या लढ्यात वारांगण जिल्ह्यातील दोन जणांनी आतापर्यंत आत्महत्या केली आहे.

Mar 28, 2012, 09:50 AM IST