मुंबईत आजपासून पाणी कपात

मुंबईत आजपासून पाणी कपात

मुंबईत आजपासून दहा टक्के पाणीकपात होणार आहे. स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. सध्या मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांत फक्त ५३ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून एक जुलैपासून दहा टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Jul 1, 2012, 12:43 PM IST