HDFC Bank : बदलती आर्थिक धोरणं आणि त्यात केल्या जाणाऱ्या अनेक तरतुदींच्या धर्तीवर आरबीआयच्या अख्तयारित राहून बऱ्याच बँका नियमांमध्ये बदल करतात. एचडीएफसी या देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेनं असेच काही नियम लागू केले आहेत.

HDFC Bank News : देशातील सर्वात मोठी खासगी बँक आणि अनेकांचे Salary Account असणाऱ्या एचडीएफसी बँकेनं नुकतंच काही नवे आणि अतीव महत्त्वाचे बदल लागू केले आहेत. या बदलांमुळं खातेधारकांवर अनेक पद्धतींनी परिणाम होतील. 15 मे 2026 पासून हे बदल लागू होणार असल्याचं सांगण्यात येत असून, त्यामुळं युजरना काही फायदेसुद्धा मिळतील. मात्र हे बदल समजून घेणंही तितकंच महत्त्वाचं.
HDFC Bank कडून Regalia Gold क्रेडिट कार्डचं रिवॉर्ड स्ट्रक्चर आणि ट्रॅवल बेनिफिट बदलण्यात आलं आहे. ज्यामुळं आता युजरना काही फायदे नव्यानं अनुभवता येतील. काय आहेत हे फायदे? पाहा...
Regalia Gold क्रेडिट कार्ड युजरना मिळणारा महत्त्वाचा फायदा म्हणजे, जर ग्राहक एका कॅलेंडर तिमाहित त्यांचा बोर्डिंग पास अपलोड करतात, तर त्यांना 2 कॉम्पिलमेंट्री बेनिफिट्स मिळतील. ज्यामध्ये Travel Edge Program अंतर्गत खालील सुविधा उपलब्ध असतील...
हे कार्ड अंतर्गत येणारं एक नवं फिचर असून, यामध्ये युजर फक्त बोर्डिंग पास अपलोड करूनच विविध सुविधांचा लाभ घेऊ शकतात. याच्या अॅक्सेससाठी SmartBuy पोर्टलवर लॉगइन करत > Regalia Gold Benefits > Boarding Pass अपलोड करावा > आणि पुढं सुविधांचा फायदा घ्यावा.
आधी 150 रुपये खर्च केल्यानंतर 4 रिवॉर्ड पॉइंट मिळत होते. तिथं आता 15 मे 2026 पासून 200 रुपये खर्च केल्यावर 5 बेस रिवॉर्ड पॉइंट मिळतील, म्हणजेच रिवॉर्ड मिळवण्याच्या पद्धतीत काही बदल.
याव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय व्यवहारांवर Dynamin Currency Conversion (DCC) शुल्क 1.75 टक्के करण्यात आलं आहे. मात्र हे त्यावेळी लागू होईल जेव्हा कार्डधारक परदेशात किंवा एखाद्या परदेशी व्यापाऱ्याशी रुपयांमध्ये आर्थिक व्यवहार कराल. बँकेच्या खास सुविधा असणारं हे कार्ड कुठं गहाळ झाल्यास ते पुन्हा जारी करून घेण्य़ासाठी 199 रुपयांचं शुल्क आकारण्यात येईल.
प्रवास करणाऱ्या अनेक मंडळींसाठी एचडीएफसीकडून दिली जाणारी ही सुविधा अतिशय खास ठरत आहे. बऱ्याचदा दूरच्या प्रवासांमध्ये आणि एकाहून अधिक विमानांनी प्रवास करायचा असल्यास विमानतळावर प्रवाशांना लाऊंज अॅक्सेस आणि तत्सम सुविधा प्रचंड फायद्याच्या ठरतात. त्यातच आता एचडीएफसीनं भरीस आणखी सुविधा दिल्यानं भटकंती करणाऱ्यांची मौज आहे असंच म्हणावं लागेल.