)
Akshay Kumar Daughter Cyber Crime: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज 'सायबर जनजागृती माह ऑक्टोबर 2025' चे उदघाटन झाले. यावेळी अभिनेता अक्षय कुमार, अभिनेत्री राणी मुखर्जी, वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना सायबर सुरक्षेचं महत्त्व अधोरेखित केलं. मात्र अभिनेता अक्षय कुमारने यावेळेस शालेय अभ्यासक्रमात सायबर क्षेत्रासंदर्भातील विषय शिकवणं गरजेचं असल्याचं नमूद केलं. अक्षय एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या मुलीला कशाप्रकारे सायबर हल्ल्याच्या माध्यमातून लक्ष्य करण्यात आलं याबद्दलचा धक्कादायक अनुभवही सांगितला.
"मी अनेक गोष्टी लिहून आणल्या होत्या मात्र माझ्याआधी अनेकजण बोललेत तर बोलायला काहीच उरलं नाही. मात्र, मला काही सांगायचं आहे, ही घटना माझ्यासोबत घडली आहे. माझी मुलगी मोबाइलवर ऑनलाइन गेम खेळत होती. तिला मॅसेजेस येत होते. धन्यवाद, मस्त, चांगलं खेळलात आणि एक मॅसेज आला तुम्ही कुठून आहात? मग एक मॅसेज आला, तुम्ही पुरुष आहात की महिला? मग समोरुन मॅसेज आला न्यूड फोटो पाठव...' असं अक्षय कुमारने मुलीसोबत घडलेल्या प्रकरणाची आठवण सांगताना म्हटलं.
"यानंतर तिने फोन बंद केला आणि माझ्या बायकोला सांगितलं," असं अक्षय म्हणाला. पुढे बोलताना, "इथून या सर्व गोष्टी सुरु होतात. इथूनच सायबर क्राइमची सुरुवात होते. अनेक गोष्टी आणि केसेस तुम्ही स्वतः बघता. मुख्यमंत्री इथे बसले आहेत. शाळेत इतिहास, भूगोल, गणीत शिकतो मात्र, सायबर क्षेत्रात जातो तेव्हा काहीच माहिती नसतं. अशा वेळी माझी विनंती आहे, शाळांमध्ये सातवी ते दहावी एक तास सायबर क्षेत्राचा असावा. आज स्ट्रीट क्राइमपेक्षा सायबर क्राइम वाढलं आहे," असं अक्षयने सांगितलं.
#WATCH | Mumbai | Actor Akshay Kumar says, "I want to tell you all a small incident which happened at my house a few months back. My daughter was playing a video game, and there are some video games that you can play with someone. You are playing with an unknown stranger. While… pic.twitter.com/z9sV2c9yC6
— ANI (@ANI) October 3, 2025
"आपल्याला माहिती आहे सायबर क्राइम वाढला आहे. लोकांचे पैसे जात आहेत. महाराष्ट्राने देशाने सर्वात चांगले सायबर क्राइम हाताळले आहे. यात जनजागृती महत्त्वाची आहे. मेंटल अवेअरनेस रिव्हर्स करता येत नाही. अशात जनजागृती अतिशय महत्त्वाची आहे," असं मुख्यमंत्री फडणवीस यावेळी मनोगत व्यक्त करताना म्हणाले.
"विद्यार्थ्यांमध्ये देखील आम्ही जनजागृती करतोय. अक्षय कुमार यांनी केलेली मागणी योग्यच आहे. तिसऱ्या वर्षापासूनच विद्यार्थ्यांच्या क्षमतेप्रमाणे शिकवणं गरजेचं आहे," असं फडणवीस म्हणाले.