बॉलिवूड अभिनेता आमिर खानने त्याच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल अनेकदा भाष्य केलं आहे.
यापूर्वी देखील त्याने 'महाभारत' मोठ्या पडद्यावर आणण्याची इच्छा व्यक्त केली होती.
'महाभारत'वर चित्रपट बनवण्यासाठी तो अतिशय जबाबदारीने काम करत आहे. तो अतिशय काळजी घेत असून त्याला कोणालाही नाराज करायचे नाही.
अलीकडेच त्याने एका मुलाखतीत विचारण्यात आले की त्याला 'महाभारत'मध्ये कोणते पात्र साकारायला आवडेल.
त्यावर अभिनेत्याने कृष्णाची भूमिका मला करायला आवडेल. या पात्रावर माझे विशेष प्रेम असल्याचं अभिनेत्याने सांगितले.
'महाभारत'वर चित्रपट तयार करण्याचं माझं स्वप्न आहे. जरी मी हा चित्रपट केला किंवा इतर कोणी केला तरी हा चित्रपट भारतात तयार व्हावा असं आमिर खान म्हणाला.
यावेळी तो म्हणाला की माझं हे स्वप्न खूप कठीण आहे. यासोबतच त्याने श्रीकृष्णाच्या भूमिकेविषयी भरभरून चर्चा केली.