करिश्मा कपूर सध्या चर्चेत आहे. तिच्या एक्स पती संजय कपूरचे निधन झाले आहे. या उद्योगपतीला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे मृत्यू झाला.
त्यामुळे करिश्मा कपूरचे वैयक्तिक आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.
अभिनेत्रीने आयुष्यात अनेकदा प्रेमासाठी मन उघडले, पण प्रत्येक वेळी तिला फसवणूक किंवा निराशा मिळाली.
करिश्मा कपूर आणि गोविंदा यांनी एकमेकांना काही काळ डेट केले होते. मात्र गोविंदा आधीच विवाहित असल्यामुळे हे नातं फार काळ टिकू शकले नाही.
'जिगर' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान करिश्मा आणि अजय देवगन एकमेकांच्या जवळ आले होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही.
करिश्मा कपूर आणि अभिषेक बच्चन यांचे लग्न ठरले होते. दोघांचा साखरपुडाही झाला होता, पण लग्नाच्या काही वेळ आधीच हे नाते संपुष्टात आले.
असे म्हटले जाते की करिश्मा कपूर आणि सलमान खान यांच्यातही काही काळ प्रेमसंबंध होते. त्यांनी एकमेकांना डेट केल्याच्या चर्चाही होत्या.
प्रेमात वारंवार अपयश मिळाल्यानंतर करिश्माने उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. मात्र हे नातेही यशस्वी ठरले नाही आणि दोघांचा घटस्फोट झाला.