या व्हिडीओत माधुरीने डॉ. नेने यांना विचारले, "भारतात सण-उत्सवानंतर अनेकांचे वजन वाढते. कारण त्यावेळी मिठाई आणि गोड पदार्थांचे सेवन केले जाते. त्यामुळे वजनात वाढ होते. पण मग ते पुन्हा कमी कसे करायचे", असा प्रश्न तिने विचारला होता.
त्यावर डॉ. नेने म्हणाले, "मी तुमच्या या गोष्टीशी निश्चितच सहमत आहे. भारतीय खाद्यपदार्थ फारच चांगले असतात. भारतातील सर्वच खाद्यपदार्थांची चव उत्कृष्ट असते. मी देखील प्रचंड फूडी आहे."
"प्रत्येकाने बॅलेन्स डाएट करणे गरजेचे आहे. विविध प्रकारची फळं खाल्ली पाहिजे. तसेच दिवसातून एकदा तरी व्यस्थित खायला हवं, जेणेकरुन तुम्हाला वारंवार भूक लागणार नाही."
"जर तुम्ही जीमला जात असाल तर प्रोटीन किंवा फॅट असणाऱ्या डाएटचा समावेश करु शकता. हे पदार्थ तुम्हाला एनर्जी देतात. पण जर तुमची लाईफस्टाईल ही धावपळीची असेल तर मात्र तुम्ही हे डाएट करणे चुकीचे ठरेल."